शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

५० वर्ष जुन्या इमारतीचे आॅडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:29 IST

राज्यभरातील विविध खासगी संस्थांच्या शाळांच्या सुमारे दोन हजारांहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, अशा इमारतींचे आॅडिट करून त्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या सभासदांनी वार्षिक सभेच्या माध्यमातून केली आहे.

नाशिक : राज्यभरातील विविध खासगी संस्थांच्या शाळांच्या सुमारे दोन हजारांहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, अशा इमारतींचे आॅडिट करून त्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या सभासदांनी वार्षिक सभेच्या माध्यमातून केली आहे. तसेच आरटीई कायद्यानुसार सर्व खासगी शाळांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला.नाशिकमधील कुसुमाग्रज स्मारकात महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. व्यासपीठावर केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा महामंडळाचे नाशिक विभाग अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, एस. टी. सुकरे, एस. पी. जवळकर,जयवंत ठाकरे, किरण सरनाईक, मारुती म्हात्रे, विनय राऊत मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगतात विजय नवल पाटील यांनी खासगी अनुदानित शाळांविषयी सरकारच्या अनास्थेवर बोट ठेवतानाच शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून संस्थांना वेतनेतर अनुदान मिळालेले नसल्याचे नमूद केले. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने १२ टक्के शिक्षणेतर अनुदान देण्याचा निर्णय दिला असतानाही सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे शासकीय शाळांची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी सरकारडून निधी उपलब्ध होतो. तर खासगी शाळांच्या इमारती अतिशय जीर्ण झालेल्या असतानाही सरकारकडून त्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या शाळांची दुरवस्था झाली आहे. अशा ५० वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या इमारतींचे आॅडिट करून त्यांच्या जागेवर नवीन इमारती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा ठराव यावेळी सर्वमताने करण्यात आला. दरम्यान, मागील सभेचे इतिवृत्त एकमताने मंजूर करून सभासदांनी माडलेले विविध ठराव सभासदांच्या संमतीने मंजूर करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापनेच्या प्रशिक्षणास संस्थांचा सहभाग, विविध न्यायालयांमध्ये सरकारविरोधात महामंडळाने केलेल्या याचिका, महामंडळासाठी अनुदान व देणग्या स्वीकारणे कर्ज उभारणे आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.खासगी अनुदानित शाळांविषयी सरकारच्या अनास्थेवर बोट ठेवतानाच शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून संस्थांना वेतनेतर अनुदान मिळालेले नसल्याचे नमूद केले. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने १२ टक्के शिक्षणेतर अनुदान देण्याचा निर्णय दिला असतानाही सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र