शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Assembly Election 2022: 5 राज्यांची सद्यस्थिती, कोणत्या राज्यात किती जागा अन् कुणाचं सरकार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:18 IST

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे

नवी दिल्ली - देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 7 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक टप्प्यात सात टप्प्यात मतदान होईल. तर, गोवा आणि पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 10 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्च रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ज्या 5 राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, तेथील सद्यस्थितीचा राजकीय आढावा आपण घेऊयात. 

उत्तर प्रदेशनिवडणुका घोषित झालेल्या 5 राज्यांपैकी सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी निवडणूक होत असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 202 जागांवर विजय मिळवावा लागेल. युपीचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून भाजपाने 303 जागांसह विजय मिळवला आहे. तर, समजावादी पक्ष 49 जागांसह प्रमुख विरोधी पक्ष आहे. 

पंजाबपंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होत असून सध्या येथे काँग्रेसचे सरकार आहे. चरणजीत सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने 77 जागांसह बहुमत सिद्ध केलं आहे. तर, 17 जागांसह आम आदमी पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. 

उत्तराखंडउत्तराखंड 70 जागांसाठी निवडणूक होत असून 36 जागा जिंकत बहुमताचा आकडा गाठता येईल. सध्या येथे भाजपचे सरकार असून पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्री आहेत. भाजपने 53 जागांसह बहुमत सिद्ध केले आहे. तर, 9 जागांसह काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. 

गोवागोव्यात 40 जागांसाठी निवडणूक होते असून राजकीय पक्षाला 21 जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध करावे लागेल. सध्या, गोव्यात भाजपचे सरकार असून प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत. 2017 मध्ये भाजपने गोव्यात 25 जागा जिंकल्या आहेत. 

मणिपूर मणिपूरमध्ये सध्या भाजप आघाडीचं सरकार असून भाजपने 29 जागा जिंकल्या होत्या. सध्या येथे भाजप नेते एन.बीरेनसिंह हे मुख्यमंत्री आहेत. तर, 15 जागा जिंकत काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्षपद मिळवले आहे. येथे नॅशनल पिपल्स फ्रंट आणि नॅशनल पिपल्स पार्टीनेही भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. 

दरम्यान, एकूणच निवडणूक जाहीर झालेल्या 5 राज्यांपैकी 4 राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि भाजपचे सरकार आहे. तर, केवळ पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आणि मुख्यमंत्री आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री