शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारी, संपदा सोहळा । नावडे मनाला, लागला टिळा पंढरीचा।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 01:42 IST

वारी माझे जीवनातील आनंदाचे पर्व आहे. ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता। निरोप या संता हाती आला।।’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतात. प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा असते, परंतु संसारामध्ये काबाडकष्ट करून थकलेला वारकरी ज्यावेळेस सुखाची अपेक्षा करतो तेव्हा त्याला आपल्या माहेराची आठवण येते.

संभाजी महाराज बिरारी, कंधानेकर

वारी माझे जीवनातील आनंदाचे पर्व आहे. ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता। निरोप या संता हाती आला।।’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतात. प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा असते, परंतु संसारामध्ये काबाडकष्ट करून थकलेला वारकरी ज्यावेळेस सुखाची अपेक्षा करतो तेव्हा त्याला आपल्या माहेराची आठवण येते. सुखरूप ऐसा दूजा कोण सांगा। माझ्या पांडुरंगा सारीखाजो।। आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मासुद्धा भक्ताची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उतावीळ।। पांडुरंगाचं आणि वारकऱ्याचं नातं म्हणजे बापलेकी समान आहे. सासरी नांदायला गेलेल्या मुलीला जशी दीपावली आणि अक्षयतृतीयेला माहेराहून भाऊ मला नेण्यासाठी येईल, चार-आठ दिवस माहेराला सुखाने राहील, तशीच अपेक्षा वारकऱ्यांची असते. तुका म्हणे मज आठवा। मूळ लवकरी पाठवा।। मनुष्य घर सोडून बाहेर गेला की, त्याला घरची आठवण नक्की येते. परंतु महाराष्ट्रातील वारकरी एकदा पंढरीच्या दिशेने चालू लागला की, त्याला घरची आठवण येत नाही, हा लाखो वारकºयांचा अनुभव आहे. घरासारखी व्यवस्था वारीत नसते. अप्राप्त परिस्थितीतसुद्धा वारकºयांच्या चेहºयावरती आनंद दिसतो. ज्ञानदेव तुकाराम... या भजनाचा आनंद घेत घेत वारकरी पंढरीच्या दिशेने चालतो. एकदा या पंढरीच्या वारीची जिवाला ओढ लागली की, प्रत्येक वर्षी वारीला जावे ही अपेक्षा मनामध्ये असते. मीसुद्धा आषाढी व कार्तिकी वारीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. आषाढी वारी ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टिळा पंढरीचा।। जावे पंढरीशी आवडे मनाशी। कधी एकादशी आषाढी हे।।’ आषाढी व कार्तिकी हे वैष्णवांचे बाजार आहे. तसेच ‘आषाढी निकट। आला कार्तिकीचा हाट।।’ शेतकरी एखाद्या पिकाचे पैसे आले, तर जसा वर्षभर पुरेल असे सामान भरून ठेवतो तसे वारकरी पंढरीच्या आषाढ व कार्तिक वारीला गेल्यावर वर्षभरासाठीचा भक्ती, ज्ञान, वैराग्य व प्रेमाचा बाजार करतात, त्यामुळे वारकरी भाविक यांना संसारातील उद्वेग जाणवत नाही. माणुसकीचा धर्म शिकवणारी वारी आहे. जात-पात, भेद-भाव, उच्च-नीच, वक्ते-श्रोते, गरीब-श्रीमंत याचा मेळावा म्हणजे पंढरीची वारी आहे.पांडुरंगाचे दर्शन घडावे हाच त्यांचा दृढ निश्चय असतो. या वारीत अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. चालताना चिखल, पाऊस यामुळे चपला तुटतात तरीही अनवाणी पायांनी मुखी हरिनामाचा गजर करीत दिंड्या पुढे जात असतात. भगव्या पताका खांद्यावरी घेऊन ‘पांडुरंग हरी ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष सुरू असतो. मुक्कामाच्या ठिकाणी जे काही मिळेल ते खाऊन सकाळी पहाटे उठून पुन्हा वारीत सहभागी होतात. दररोजचा दिनक्रम ठरलेला असतो.जग, जीव, जनार्दन जाणून घेण्याची संधी म्हणजे वारी आहे. सामुदायिक पंगतीतील भोजन किती आनंददायी व ऊर्जा देणारे आहे हे कळते. आपले वैशिष्ट्य विसरून समरस होणे, आपला अहंकार बाजूला ठेवून जगणे, चालणे म्हणजे वारी होय. मनुष्याने देवाकडे केलेला प्रवास हा वारी शब्दाचा अर्थ आहे. केवळ पायी चालणे म्हणजे वारी होत नाही. आळंदी येथे लहानपणी वारकरी शिक्षणासाठी असल्यामुळे वारकरी साधना व उपक्र म मनात व नसानसात घर करून बसली आहे, त्यामुळे पंढरीची वारी हा वारकरी मंडळीचा साधन मार्गातील महत्त्वाचा घटक आहे. ‘जो करतो वारी। मी त्याची येरझार सारी।।’ तसेच ‘जो करतो पंढरीची वारी। तो काळाला मागे सारी।।’ पंढरीची वारी अनेक प्रकारची आहे, विधीची वारी नियम म्हणून, रु ढीची वारी आई-वडिलांची आज्ञा पालनार्थ, आवडीची वारी भक्तीची आवड म्हणून, ‘मज भक्तिची आवडी। सेवा व्हावी ऐसी जोडी।।’ सकाम वारी म्हणजे फल प्राप्त्यर्थ, तर निष्काम वारी जीवनमुक्तीचे सुख प्राप्त्यर्थ, अर्थात पंढरीची वारी एक साधना आहे आणि अशी वारी ज्यांना घडते ते वारकरी मोक्षाचे अधिकारी होतात, असे तुकाराम महाराज म्हणतात. पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे।।(लेखक अ. भा. वारकरी  मंडळाचे पदाधिकारी आहेत)

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी