शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपयांनी वाढ

By दिनेश पाठक | Published: May 04, 2024 4:55 PM

मागील वर्षी कांद्याच्या निर्यातीतून देशाला ४,६५० कोटी रूपयांचे परकीय चलन मिळाले होते. यंदा मात्र परकीय चलन पदरात पडले नाही. आता मात्र ‘देर आये दुरुस्त आये’ अशी स्थिती आहे.

नाशिक : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान हाेण्यापूर्वी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली आहे. निर्यातबंदी हटताच शनिवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला ५०० रूपये जास्तीचा भाव मिळाला. मागील वर्षी कांद्याच्या निर्यातीतून देशाला ४,६५० कोटी रूपयांचे परकीय चलन मिळाले होते. यंदा मात्र परकीय चलन पदरात पडले नाही. आता मात्र ‘देर आये दुरुस्त आये’ अशी स्थिती आहे.

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी हटविण्यात आली आहे. शेजारील देशांकडून भारतीय काद्यांला मोठी मागणी आहे. निर्यात केली नाही तर कांदा चाळीत सडेल अशी स्थिती सध्या होती.

शेजारील देशांकडून भारतीय काद्यांला मोठी मागणी आहे. एका बाजूला जरी निर्यातबंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आलं आहे. निर्यात शुल्क आकारल्यामुळं देशात कांद्याच्या किंमती वाढणार नाहीत, याची दक्षता सरकारनं घेतल्याचं बोललं जात आहे. केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसत होता. यानंतर एनसीईएलच्या माध्यमातून सहा देशांत निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. अखेर शुक्रवारी (दि.३) रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा नवा निर्णय घेतला. उन्हाळ कांदा बाजारात आल्यापासून कांदा निर्यातीवर बंदी होती.

केवळ ९९ हजार १५० टन कांद्याला मार्चपासून टप्प्याटप्प्याने परवानगी दिली होती. मात्र प्रत्यक्षात कांदा निर्यात केवळ ६ हजार टन इतकीच झाल्याने त्याचा स्थानिक बाजारपेठेतील शेतकऱ्यांच्या कांद्यावर काहीच परिणाम झाला नाही. परिणामी किंमती ५ ते १२ रुपयांदरम्यान राहिल्या होत्या. निर्यातबंदी हटताच नाशिक जिल्ह्यातील विंचूर, पिंपळगाव आदी बाजार समित्यांमध्ये २२ ते २५ रूपये किलोचा भाव मिळाला.पंतप्रधानांच्या सभेपूर्वीच निर्णय

देशभरात लागणारा ७० ते ८० टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून निर्यात होताे. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष होता. त्यातच लोकसभा निवडणुकीचा सणसंग्राम सुरू असल्याने कांदा बेल्ट भागात मतदान हाेण्यापूर्वीच निर्यातबंदी हटविली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा १० मे राेजी कांद्याची बाजारपेठ असलेल्या पिंपळगावात हाेत आहे. त्यापूर्वीच निर्यातबंदी हटविल्याने शेतकऱ्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यातील राजकीय पटलावर उमटली.मागील वर्षी ९ लाख टन कांद्याची निर्यात

मागिल वर्षी कांद्याच्या निर्यातीवर बंधन नव्हते. त्यामुळे जानेवारी ते एप्रिल २०२३ या काळात विक्रमी ९ लाख ८० हजार टन कांद्याची निर्यात झाली. यावर्षी निर्यात बंदी होती. दुस-या बाजूला तापमान सरासरीपेक्षा ३ ते ६ डिग्री सेल्सियस अधिक असल्याने कांद्याची साठवणूक करणे शेतक-यांना अवघड झाले होेते. कांदा लवकर खराब होत होती. शेजारील देशांकडून भारतीय काद्यांला मोठी मागणी आहे. निर्यात केली नाही तर कांदा सडत होता.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा