शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

कलात्मक गझलांतून परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:39 IST

नाशिकरोड : मराठी गझलकाराने गायकी ढंगाने गझल लिहायला हव्यात. उर्दू गझलेत मार्क्सवाद येऊ शकतो, तर मराठी गझलेत आंबेडकरवाद का येऊ नये. कलात्मक ढंगाने गजल लिहिली तर ती समाज परिवर्तन घडवून आणते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार डॉ. अजीज नदाफ यांनी केले.

ठळक मुद्देमराठी गझलेत आंबेडकरवाद का येऊ नये.मान्यवर उपस्थित

के. जे. मेहता हायस्कूलमध्ये पहिल्या आंबेडकरवादी गझलवेध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना गझलकार डॉ. अजीज नदाफ. समवेत संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर, प्रवीण जोशी, गणपतराव मुठाळ, मिलिंद पांडे, प्रदीप औटे.

 

अजीज नदाफ : आंबेडकरवादी गझलवेध संमेलनाचे उद्घाटन

नाशिकरोड : मराठी गझलकाराने गायकी ढंगाने गझल लिहायला हव्यात. उर्दू गझलेत मार्क्सवाद येऊ शकतो, तर मराठी गझलेत आंबेडकरवाद का येऊ नये. कलात्मक ढंगाने गजल लिहिली तर ती समाज परिवर्तन घडवून आणते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार डॉ. अजीज नदाफ यांनी केले.के. जे. मेहेता हायस्कूलच्या प्रांगणात पहिल्या आंबेडकरवादी गझलवेध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. नदाफ बोलत होते. नदाफ पुढे म्हणाले की, गझलमधील गेयता सुटू देता कामा नये. अरबी उर्दू गझल उच्चारानुगामी आहे. त्यामुळे ती लघु गुरूच्या नियमात बसत नाही. येत्या पन्नास वर्षातील मराठी गझलेचे हे सुरुवात युग आहे. मराठीतल्या गझलकारांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जगण्यातली वास्तवता गझलेत आणली आहे. समाज मनाचा आरसा म्हणजेच गझल होऊ शकते, असेही डॉ. नदाफ यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर यांनी पहिले आंबेडकरवादी गझल संमेलन ऐतिहासिक घटना सांगेल, असा विश्वास वाटतो. वामनदादा कर्डक यांनी लावलेल्या बीजाचे झाड होईल. नव्या प्रतिभा भरकटलेल्या होत्या त्यांना दिशा मिळत नव्हती. आता गझलांना क्र ांतीचे सूत्र मिळत असून, विज्ञान निष्ठा आणि वैश्विकता या गोष्टी या गझलवेध संमेलनात पहायला मिळत आहे, असे मनोहर यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर, प्रवीण जोशी, गणपतराव मुठाळ, मिलिंद पांडे, हरेंद्र जाधव, प्रदीप आवटे, शरद शेजवळ, स्वागताध्यक्ष नंदकिशोर साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.गझल संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुसरे सत्र डॉ. महेंद्र भवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यामध्ये ‘आंबेडकरी गझलेचा सूर्योदय- वामनदादा’ या विषयावर गझलकार अशोक जाधव, रविचंद्र हादसंकर, प्रशांत धनविज यांनी आपली मते मांडली. त्यानंतर झालेल्या तिसºया सत्रामध्ये सिद्धार्थ भगत यांच्या अध्यक्षतेखाली मुशायरा पार पडला. अखेरच्या सत्रात गझल गायक डॉ. संजय मोहड यांच्या गझल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. आज संमेलनाचा समारोप गझलवेध संमेलनात रविवारी (दि.१८) सकाळी १०.३० वाजता गझलगायन, दुपारी १२ वाजता मुशायरा, दुपारी २.३० वाजता ‘आंबेडकरवादी गझलेचे सौंदर्यशास्त्र’ या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ४ वाजता ‘आंबेडकरवादी गझलेतील नक्षत्रमुद्रा’ या विषयावर चर्चासत्र आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. यावेळी गायक नंदेश उमप यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.