शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:42 IST

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.शहरास मुख्य पाणी पुरवठा गिरणा धरण प्रादेशिक योजनेतून होत असतो. थकबाकीचे कारण पुढे करून वारंवार पाणी पुरवठा तोडण्याची धमकी देणार्या जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची ८५ लाख रु पयांची थकबाकी चुकती करून जिल्हा परिषदेचे ऋण फेडल्याने यापुढे पाण्याचे आवर्तनं वेळेवर येईल अशी आशा नांदगाव करांच्या मनात निर्माण झाली होती.सुरवातीचे काही आवर्तन त्याप्रमाणे आले देखील. पण महिना दीड महिन्यात येरे माझ्या मागल्याची पुनरावृत्ती होत गेली. आठ दिवसांवर आलेला पाणी पुरवठा पंधरा ते वीस दिवसांवर गेला आहे. घरातले पाणी संपले कि... केव्हा येणार पाणी.... अशी विचारणा सुरु होते. पाणी पुरवठा करणाºया यंत्रणेकडे त्याचे उत्तर नसते व आशेच्या मृगजळामागे नांदगावकर धावत असतात.गिरणा धरणात सुमारे ६००० द.ल.घ.फु जलसाठा आहे. त्यावर अवलंबून पाणी पुरवठा योजनांसाठी तो पुढील दीड ते दोन वर्ष पुरेल एवढा असल्याची माहिती आहे. मात्र जलवाहिनी फुटणे, पंप नादुरुस्त होणे, कर्मचारी गैरहजेरीमुळे वेळापत्रक विस्कळीत होणे अशा अनेक कारणांमुळे पाणी पुरवठ्याची अक्षरश: वाट लागली आहे. तालुक्यात एक दोन ठिकाणचा अपवाद वगळता कुठे हि पृष्ठभागावर पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या असून ४५० ते ६०० फुट खोलीवरचे पाणी वापरायला व नाईलाजाने अथवा नकळत पिण्यात आल्याने नागरिक आजारी पडत आहेत. लिंबुपाणी, सरबते बर्फाचे गोळे यांचा सिझन आहे. त्यात कोणते पाणी असते? असेच राहिले तर नजीकच्या काळात किडनी, यकृत व कर्करोगाने आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल असे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त करत आहेत.सद्यस्थितीत सुरु असलेल्या योजनेचे आयुष्य संपले आहे नवीन योजनेच्या सवंग घोषणा केल्या जातात. परंतु पावले उचलली जात नाहीत. पोहोºयात पाणी असून ही नांदगावकरांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण भटकणे आले आहे.