शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:42 IST

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.शहरास मुख्य पाणी पुरवठा गिरणा धरण प्रादेशिक योजनेतून होत असतो. थकबाकीचे कारण पुढे करून वारंवार पाणी पुरवठा तोडण्याची धमकी देणार्या जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची ८५ लाख रु पयांची थकबाकी चुकती करून जिल्हा परिषदेचे ऋण फेडल्याने यापुढे पाण्याचे आवर्तनं वेळेवर येईल अशी आशा नांदगाव करांच्या मनात निर्माण झाली होती.सुरवातीचे काही आवर्तन त्याप्रमाणे आले देखील. पण महिना दीड महिन्यात येरे माझ्या मागल्याची पुनरावृत्ती होत गेली. आठ दिवसांवर आलेला पाणी पुरवठा पंधरा ते वीस दिवसांवर गेला आहे. घरातले पाणी संपले कि... केव्हा येणार पाणी.... अशी विचारणा सुरु होते. पाणी पुरवठा करणाºया यंत्रणेकडे त्याचे उत्तर नसते व आशेच्या मृगजळामागे नांदगावकर धावत असतात.गिरणा धरणात सुमारे ६००० द.ल.घ.फु जलसाठा आहे. त्यावर अवलंबून पाणी पुरवठा योजनांसाठी तो पुढील दीड ते दोन वर्ष पुरेल एवढा असल्याची माहिती आहे. मात्र जलवाहिनी फुटणे, पंप नादुरुस्त होणे, कर्मचारी गैरहजेरीमुळे वेळापत्रक विस्कळीत होणे अशा अनेक कारणांमुळे पाणी पुरवठ्याची अक्षरश: वाट लागली आहे. तालुक्यात एक दोन ठिकाणचा अपवाद वगळता कुठे हि पृष्ठभागावर पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या असून ४५० ते ६०० फुट खोलीवरचे पाणी वापरायला व नाईलाजाने अथवा नकळत पिण्यात आल्याने नागरिक आजारी पडत आहेत. लिंबुपाणी, सरबते बर्फाचे गोळे यांचा सिझन आहे. त्यात कोणते पाणी असते? असेच राहिले तर नजीकच्या काळात किडनी, यकृत व कर्करोगाने आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल असे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त करत आहेत.सद्यस्थितीत सुरु असलेल्या योजनेचे आयुष्य संपले आहे नवीन योजनेच्या सवंग घोषणा केल्या जातात. परंतु पावले उचलली जात नाहीत. पोहोºयात पाणी असून ही नांदगावकरांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण भटकणे आले आहे.