शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:42 IST

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.शहरास मुख्य पाणी पुरवठा गिरणा धरण प्रादेशिक योजनेतून होत असतो. थकबाकीचे कारण पुढे करून वारंवार पाणी पुरवठा तोडण्याची धमकी देणार्या जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची ८५ लाख रु पयांची थकबाकी चुकती करून जिल्हा परिषदेचे ऋण फेडल्याने यापुढे पाण्याचे आवर्तनं वेळेवर येईल अशी आशा नांदगाव करांच्या मनात निर्माण झाली होती.सुरवातीचे काही आवर्तन त्याप्रमाणे आले देखील. पण महिना दीड महिन्यात येरे माझ्या मागल्याची पुनरावृत्ती होत गेली. आठ दिवसांवर आलेला पाणी पुरवठा पंधरा ते वीस दिवसांवर गेला आहे. घरातले पाणी संपले कि... केव्हा येणार पाणी.... अशी विचारणा सुरु होते. पाणी पुरवठा करणाºया यंत्रणेकडे त्याचे उत्तर नसते व आशेच्या मृगजळामागे नांदगावकर धावत असतात.गिरणा धरणात सुमारे ६००० द.ल.घ.फु जलसाठा आहे. त्यावर अवलंबून पाणी पुरवठा योजनांसाठी तो पुढील दीड ते दोन वर्ष पुरेल एवढा असल्याची माहिती आहे. मात्र जलवाहिनी फुटणे, पंप नादुरुस्त होणे, कर्मचारी गैरहजेरीमुळे वेळापत्रक विस्कळीत होणे अशा अनेक कारणांमुळे पाणी पुरवठ्याची अक्षरश: वाट लागली आहे. तालुक्यात एक दोन ठिकाणचा अपवाद वगळता कुठे हि पृष्ठभागावर पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या असून ४५० ते ६०० फुट खोलीवरचे पाणी वापरायला व नाईलाजाने अथवा नकळत पिण्यात आल्याने नागरिक आजारी पडत आहेत. लिंबुपाणी, सरबते बर्फाचे गोळे यांचा सिझन आहे. त्यात कोणते पाणी असते? असेच राहिले तर नजीकच्या काळात किडनी, यकृत व कर्करोगाने आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल असे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त करत आहेत.सद्यस्थितीत सुरु असलेल्या योजनेचे आयुष्य संपले आहे नवीन योजनेच्या सवंग घोषणा केल्या जातात. परंतु पावले उचलली जात नाहीत. पोहोºयात पाणी असून ही नांदगावकरांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण भटकणे आले आहे.