शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

नांदूरशिंगोटेत स्थलांतरित ५५ जणांची निवारागृहात व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:01 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा फटका : भोजन, राहण्याची सोय; मूलभूत सुविधा पुरविणार

नांदूरशिंगोटे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१दिवसांचा लॉकडाउन झाल्यानंतर कामगार व मजुरांचे लोंढे स्थलांतरित होताना दिसत आहेत. शासनाने या स्थलांतरित कामगारांसाठी नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप येथे निवारागृह उभारले असून, त्यात ५५ जण दाखल झाले आहेत. निवारा केंद्रात स्थलांतरित कामगारांची राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.लॉकडाउन व संचारबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक बांधकाम, दुकाने आणि कारखाने बंद पडले आहेत. यामुळे परप्रांतीय व परजिल्ह्यातील कामगार स्थलांतरित होताना दिसत आहेत. बस, खासगी वाहने आणि रेल्वे बंद असल्याने शेकडो कामगार रस्त्याने कुटुंबासह महिला व अबालवृद्धांना घेऊन जाताना दिसत आहेत. तहसीलदार राहुल कोताडे, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यकपोलीस निरीक्षक रणजित लांडगे यांनी जागेची पाहणी करून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथील हॉटेल संदीप या ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. तहसीलदार राहुल कोताडे यांनी या ठिकाणी शिधा पोहोचकेला आहे. कामगारांनी या ठिकाणी थांबण्याचे आवाहन तहसीलदार कोताडे, वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत लांडगे यांनी केले आहे. दरम्यान, गुरु वारी दुपारी दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांनी निवारागृहात असणार्या स्थलांतरित कामगारांची तपासणी केली.विभागीय आयुक्तांकडून तपासणीनाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी व निवारागृह उभारण्यात आले आहे. मंगळवारी रात्री अचानक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच त्यांनी नाशिकपासून अहमदनगर जिल्ह्यातील बोटा हद्दीपर्यंत असणार्या चेकपोस्टची तपासणी करून सूचना दिल्या. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधीत लोकांना मुलभुत सुविधा पुरविण्याच्या सुचना त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या. तसेच नाशिक-पुणे, सिन्नर -शिर्डी व सिन्नर -घोटी मार्गावर पायी जाणार्या स्थलांतरित मजुरांना व कामगारांना या ठिकाणी थांबून आधार दिला जाणार आहे. या कामगारांच्या भोजनासह राहण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे, त्यांना आंघोळ, जेवण, स्वच्छता आणि तपासणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. सिन्नर येथील एका मंगल कार्यालयात तर नांदूरशिंगोटे येथे पुणे महामार्गावर संदीप हॉटेलजवळ आणि वावी येथे शिर्डी महामार्गावर साई मनोहर सांस्कृतिक भवन येथे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य