शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

जागावाटपाच्या चर्चेने सेना इच्छुकांना धाकधूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 19:43 IST

गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व सेनेची युती होणार की नाही याची चर्चा रंगत असून, एकीकडे युती होणार असल्याचे जाहीरपणे सांगितले जात असताना जागावाटपाच्या फार्र्म्युल्यावरून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याची

ठळक मुद्देकिती जागा मिळणार : पर्याय शोधण्यास सुरुवातसेनेच्या वाट्याला किती जागा मिळतील याची उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत जागा वाटपाची अंतिम बोलणी होवून जागावाटपाचे सूत्रही ठरल्याचे जाहीर झाल्याने सेनेच्या इच्छुकांची उत्सुकता ताणली गेली असून, सेनेच्या वाट्याला मिळणाऱ्या जागांमध्ये आपल्या मतदारसंघाचा समावेश आहे किंवा नाही याची धाकधूक वाढली आहे. जागावाटपात मतदार संघ पक्षाला सुटला नाही तर निवडणुकीची तयारी वाया जाऊ नये म्हणून अन्य पर्यायांचा विचारही काहींनी सुरू केला असून, त्यासाठी विरोधकांशी संपर्क साधण्याची तयारी चालविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व सेनेची युती होणार की नाही याची चर्चा रंगत असून, एकीकडे युती होणार असल्याचे जाहीरपणे सांगितले जात असताना जागावाटपाच्या फार्र्म्युल्यावरून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसल्याचेही चित्र आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी युतीचा फार्म्युला लोकसभा निवडणुकी दरम्यानच फिफ्टी-फिफ्टी ठरल्याचे व समसमान मंत्रिपदे देण्याचा निर्णय झाल्याचे जाहीर केले आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा काही फार्म्युला ठरलेला नसल्याचे सांगून सेनेला खोटे ठरविले आहे. युतीच्या जागावाटपात विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षांकडे कायम ठेवण्याची चर्चा होत असताना दुसरीकडे सेनेचे मंत्री दिवाकर रावते हे सेनेचे मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडणार नसल्याचा इशारा देत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या चार ते पाच दिवसांपासून युतीची जागावाटपाची बोलणी केली जात असून, दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यावर सहमती दर्शवित जागावाटपाचे सूत्रही ठरविल्याचे वृत्त आहे. राज्यातील २८८ पैकी १४४ जागांची मागणी करणा-या सेनेला भाजपने १२६ जागा देण्याची तयारी दर्शविली असून, सेनाही त्यासाठी तयार झाल्याची चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील दहा जागांवर दावा सांगणा-या सेनेच्या वाट्याला किती जागा मिळतील याची उत्सुकता इच्छुकांना लागून आहे. कारण जागा वाटपात मतदारसंघ सेनेला सुटेल अशी आशा बाळगून जिल्ह्यातील नाशिक पश्चिम, नांदगाव, कळवण, बागलाण या मतदारसंघातील इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून तयारी चालविली असल्यामुळे आता या मतदारसंघाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ज्या मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांनी तयारी केली आहे, तो मतदारसंघ भाजपाला सोडल्यास सेना इच्छुक काय भूमिका घेणार? असा प्रश्न निर्माण झाला असून, इच्छुकांना आमदारकीचे पडलेले स्वप्ने पाहता पुन्हा पाच वर्षे वाट पहायला ते व त्यांचे समर्थक कार्यकर्ते तयार नसल्यामुळे इच्छुकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेना