शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बेफिकिरीबरोबरच संवेदनहीनता लागली वाढीस

By किरण अग्रवाल | Updated: January 24, 2021 00:27 IST

नाशिक महापालिकेत लागलेली आग असो, की त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिरसगाव आरोग्य केंद्रात घडलेला प्रकार, यातून यंत्रणांची बेफिकिरी उघड झाली आहे. यास पर्यवेक्षकीय व्यवस्था जबाबदार ठरावी.

ठळक मुद्देव्यवस्थेतील अव्यवस्थेला कोणी जबाबदार आहे की नाही?भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत निष्पाप, निरागस बालकांचा बळी नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात आग लागल्याने त्याचाही मोठा गहजब सध्या सुरू आहे. खासगीला वेठीस धरतात, मग स्वतःचे काय?

सारांश

कोणतीही दुर्घटना पूर्वसूचना देऊन घडत नाही हे खरे; परंतु अशा घटनांना मुख्यत्वे मानवी चुकाच कारणीभूत असतात हेदेखील तितकेच खरे. व्यवस्थांमध्ये मात्र कौतुकाला स्वतःस पात्र धरून चुकांसाठी दुसऱ्यांकडे अगर कनिष्ठांकडे बोट दाखविण्याची प्रथा असल्याने अप्रिय घटनांसाठीचा दोष दुसऱ्याच्या माथी मारण्याचे प्रयत्न केले जातात. बेफिकिरीबरोबरच संवेदनहीनता उघड करणाऱ्या अशा घटनांबद्दलची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे असते; पण ते तितक्याशा गांभीर्याने होताना दिसत नाही. भंडाऱ्यात प्रारंभी तेच झाले व नाशिक महापालिकेतील तसेच शिरसगाव आरोग्य केंद्रात अलीकडेच घडलेल्या घटनांप्रकरणीही तेच होताना दिसावे हे दुर्दैवी आहे.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत निष्पाप, निरागस बालकांचा बळी गेल्यावर राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व प्रत्येक ठिकाणच्या इलेक्ट्रिकल व फायर ऑडिटचा विषय चव्हाट्यावर आला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणाही आउटडेटेड असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले. नवजात बालक कक्ष व प्रसूती कक्षातील फायर एक्सटिंग्विशरची मुदत संपुष्टात येऊन आठ महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने धावपळ करून दुसऱ्याच दिवशी ही यंत्रणा बदलली गेली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे ११० प्राथमिक आरोग्य केंद्रांचेही फायर ऑडिट सुमारे दोन वर्षांपासून झाले नसल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले. नाशिकमधील केवळ ४२ शाळांनी आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केल्याची बाब माहितीच्या अधिकारात पुढे आली.

यंत्रणांची बेफिकिरी तर यात आहेच आहे, शिवाय संवेदनाही किती बोथट झाल्या आहेत त्याचीही उदाहरणे कमी नाहीत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव आरोग्य केंद्रात अलीकडेच घडलेली घटना या संदर्भात पुरेशी बोलकी आहे, तेथे एकाच दिवसात चाळीस भगिनींवर कुटुंब नियोजनाची शस्रक्रिया करून त्यांना त्यांच्या लहानग्या बाळांसह एकाच खोलीत चक्क जमिनीवर झोपविले गेले. निवासाची व अंथरूणाची पुरेशी व्यवस्था नव्हती तर उद्दिष्टपूर्तीसाठी एकाच दिवशी इतक्या शस्रक्रिया करून झेंडे गाडणे गरजेचे होते काय, असा प्रश्‍न यातून उपस्थित झाला आहे. थंडीच्या दिवसात घरून आणलेल्या किरकोळ अंथरूणावर या भगिनी आपल्या तान्हुल्यासह जमिनीवर झोपल्या हे किती अमानवीय, निष्ठुर आहे; पण यंत्रणेत काम करणाऱ्यांची मानसिकता इतकी निबर झाली आहे की त्यांना जराही हळहळ वाटली नाही. तेव्हा प्रश्न हा यंत्रणेत बळावत चाललेल्या या संवेदनहीनतेचा आहे.

नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात आग लागल्याने त्याचाही मोठा गहजब सध्या सुरू आहे. दुर्घटना कुठलीही असो, त्याचे राजकारण करता येऊ नये; पण या आगीवरही आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रथेप्रमाणे चौकशी समितीही नेमली गेली आहे, तिचे अहवाल काय यायचे ते येतील व बड्यांना बचावून तत्सम लोकांवर कारवायांचे सोपस्कर पूर्ण केले जातील; पण घटना घडून गेल्यावर याकडे लक्ष देण्याऐवजी यासंबंधीची जबाबदारी असणाऱ्या पर्यवेक्षकीय अधिकाराच्या व्यक्तींकडून अगोदरच का काळजी घेतली जात नाही हा खरा प्रश्न आहे. यंत्रणांमधील शीर्षस्थ नेत्यांनी या निमित्ताने गांभीर्यपूर्वक लक्ष पुरवणे गरजेचे आहे.खासगीला वेठीस धरतात, मग स्वतःचे काय?अग्निशमन यंत्रणा वगैरे बाबींसाठी सरकारी व निमसरकारी यंत्रणांकडून खासगी आस्थापनांना नेहमीच वेठीस धरले जाते. मध्यांरी याच संदर्भाने खासगी रुग्णालयांच्या मागे ससेमिरा लावला गेला होता व भंडावून सोडले गेले होते; पण त्याच नियम निकषांचे खुद्द सरकारी रुग्णालयांमध्ये वा कार्यालयांमध्ये मात्र पालन होत नसल्याचे यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान व स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशीच ही अवस्था आहे. दुसऱ्यांचा छळ करताना स्वतःच्या उणिवांकडेही लक्ष दिले गेले तर भंडाऱ्यासारख्या घटना घडणार नाहीत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfireआगNashikनाशिकBhandara Fireभंडारा आगdocterडॉक्टर