शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

लोकप्रतिनिधींच्या तक्रार निवारणासाठी उपसमितीची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 01:28 IST

जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटपाबाबत लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या तक्रारींची दखल घेत पाच आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करून त्याआधारे तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले, तर यापुढे शिल्लक निधीचे समान वाटप करण्याबरोबरच सुहास कांदे यांच्या मतदारसंघासाठी ७३ कोटींचा निधीही देण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती : निधीचे समान वाटप, कांदेंना ७३ कोटी

नाशिक : जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटपाबाबत लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या तक्रारींची दखल घेत पाच आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करून त्याआधारे तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले, तर यापुढे शिल्लक निधीचे समान वाटप करण्याबरोबरच सुहास कांदे यांच्या मतदारसंघासाठी ७३ कोटींचा निधीही देण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२०- २१ या वर्षासाठी शासनाने दिलेल्या एकूण निधीच्या ९६ टक्के निधी खर्च झाला असून, सन २०२१-२२ या वर्षासाठी ८६० कोटी ९५ लाख रुपयांचा नियतव्यय अर्थसंकल्पीत असून, त्यापैकी ५९२ कोटी एवढा निधी शासनाने बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी फक्त दहा टक्केच निधी खर्च करण्याचे शासनाचे आदेश असल्याने ऑक्टोबरअखेर ६२ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. वन खात्याला दिलेल्या निधीच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आल्या असून, त्यासंदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. मात्र, शासनाने निधी खर्चावर निर्बंध उठविल्याचे त्यांनी सांगितले. निधी वाटपावरून होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन पाच आमदार व शासकीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली असून, ही समिती आपल्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन धोरणात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी (दि.१६) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी ७३ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला असून, यापुढे सर्वच लोकप्रतिनिधींना निधीचे समान वाटप करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे ते म्हणाले.

चौकट====

मालेगावच्या आमदारांचे ‘वॉकआउट’

या बैठकीसाठी मालेगावचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती हे थोड्या उशिराने दाखल झाले. मात्र, काही वेळातच त्यांनी सभागृह सोडत बाहेरचा रस्ता धरला व सभागृहाबाहेर समर्थकांसह उभे राहिले. गेल्या दोन वर्षांपासून आपल्या मतदारसंघासाठी एक रुपयाही निधी मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. लोकप्रतिनिधींना निधी मिळणार नसेल, तर सभागृहात बसून काय उपयोग, असा सवाल करून आपण एमआयएमचे आमदार असल्यामुळे सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोपही आमदार मौलाना यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार