शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पकडून दिलेल्या दारु भट्ट्यांबाबत कारवाई न केल्याने संतप्त महिलाचा पोलिस ठाण्यात येऊन विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 19:24 IST

लोकमत न्युज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : गावात राजरोस सुरु असलेल्या दारु भट्यांविरोधात तेथील महिलांनी पुढाकार घेऊन रसायनासह अन्य साहित्य पकडून ...

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : तळेगाव अंजनेरीच्या रणरागिणी जाणार वरिष्ठांकडे ; पोलिसांच्या भुमिकेबद्दल संशय

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : गावात राजरोस सुरु असलेल्या दारु भट्यांविरोधात तेथील महिलांनी पुढाकार घेऊन रसायनासह अन्य साहित्य पकडून पोलिसांच्या हवाली केले मात्र त्यानंतर त्र्यंबक पोलिसांकडून पुढील कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त महिलांनी पोलिस स्टेशनमध्ये येवून आपला रुद्रावतार दाखविला, मात्र अखषर नाराज होवून त्या वरिष्ठांकडे जाणार असल्याचे सांगत माघारी परतल्या.तळेगाल (अंजनेरी) येथील बचत गटाच्या महिलांनी गुरुवारी (दि.२) त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात येऊन रणरागिणी बनत आम्ही गावातील महिला पोलीस पाटील यांच्या सहाय्याने गावाच्या शिवारातील गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य रसायन गॅस सिलेंडर आदी साहित्य व तीन हजार लिटर तयार दारु पकडुन दिली होती.साहेब, तुम्ही स्वत: येऊन पाहणी केली होती. पोलीसांसमवेत तुम्ही स्वत:हजर असतांना अद्याप दारु उत्पादक व दारु विक्रेते मोकाट आहेत. त्यांचा पुन्हा नव्या जोमाने व्यवसाय सुरु आहे. आपण केलेल्या कारवाईचे पुढे काय झाले, हे विचारण्यासाठी या महिलांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आल्या होत्या.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) या गावात गावठी दारुची सर्रास विक्र ी होत असल्याने त्याचा खरा त्रास महिला वर्गालाच होत असतो. शेवटी घरात रोजच्या कटकटी भांडणे प्रसंगी बायकांना मारहाण या रोजच्या त्रासाला कंटाळून महिला स्वत:च रणरागिणी बनत महालक्ष्मी बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेत सुमारे ३००० लिटर दारु पोलीसांना पकडुन दिली.यावेळी दारु ची पिपे, टाक्या, गॅसचे सिलेंडर आदी मुद्देमाल उचलुन आणुन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात जप्त केला. त्यानंतर कडक कारवाई करतो असे सांगुन महिलांना शांत केले. पण दारु व्यावसायिक अधिक निभीॅड झाले व त्यांचा दारु व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला.याउलट तक्र ारदार महिलांना आडुन पाडुन, बोलणे टोमणे मारणे सुरु केले. पोलिसांनी या प्रकरणी काहीच कारवाई न केल्याने पुन्हा या महिला संतप्त झाल्या व त्यांनी भुरुवारी रणरागिणी बनुन त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यावर धडकल्या.त्यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांना पुनश्च निवेदन देत जाब विचारला. त्या म्हणाल्या, आपण तर म्हणाला होतात आम्ही त्वरीत कार्यवाही करु तुम्ही काही काळजी करु नका तुम्हीच होताना? तुम्ही स्वत: आले होते. असे असताना पुढे कोणतीहि कारवाई झाली नाही? काबर दारु भट्ट्यांविरुध्द कारवाई केली नाहीत? असे म्हणुन साहेबाना विचारले.तुमच्याने पोलिसी कारवाइ होणशर नसेल तर आम्ही नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरती सिंह, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन आमची कैफीयत मांडणार असल्याचे सांगुन सर्व महिला पोलिस ठाण्यातून माघशरी फिरल्या. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात याविषयावरच चर्चा रंगत होत्या. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी