शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यात बंदी विरोधात संतप्त शेतकरी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 18:00 IST

कळवण : केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाच्या विरोधात व कळवण बाजार समतिीत कांदा व्यापारी बांधवाना खरेदीचे निर्बंध लादल्याने व्यापारी लिलावात सहभागी झाले नसल्याने 425 ट्रॅक्टरमधील 11 हजार क्विंटल कांदा लिलाव झाला नाही त्यामुळे कळवण तालुक्यातील संतप्त शेतकर्यांनी बसस्थानक परिसरात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा बाजी करीत रास्ता रोको करून निषेध नोंदवला यावेळी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करु न तहसीलदार बी ए कापसे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकळवण : शेतकऱ्यांचा रास्ता रोको, ४२५ ट्रॅक्टर कांद्याची आवक

कळवण : केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाच्या विरोधात व कळवण बाजार समतिीत कांदा व्यापारी बांधवाना खरेदीचे निर्बंध लादल्याने व्यापारी लिलावात सहभागी झाले नसल्याने 425 ट्रॅक्टरमधील 11 हजार क्विंटल कांदा लिलाव झाला नाही त्यामुळे कळवण तालुक्यातील संतप्त शेतकर्यांनी बसस्थानक परिसरात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा बाजी करीत रास्ता रोको करून निषेध नोंदवला यावेळी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करु न तहसीलदार बी ए कापसे यांना निवेदन देण्यात आले.अतिवृष्टी महापुरामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतर राज्यातून येणार्या लाल कांद्याची अवाक घटल्याने गावठी कांद्याचे दर गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक वाढले होते. त्यामुळे शेतकर्यांना अनेक वर्षानंतर दोन पैसे जास्त भाव मिळत होता. मात्र केंद्र शासनाने शहरी भागातील कांदा खाणार्यांची विचार करून निर्यात बंदी करून कांदा भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयन्त केला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळी नाकोडा येथील कांदा मार्केट यार्डात जवळपास 425 ट्रॅक्टची अवाक झाली होती. शासनाच्या धोरणानुसार व्यापार्यांकडे पाचशे क्विंटल पेक्षा जास्त कांदा साठा नको असल्याने आज कांदा लिलाव झाले नाहीत. तसेच कांदा व्यापारी जिल्हा असोसिएशनची बैठक घेतल्याने सर्व कांदा व्यापारी गेल्याने संतप्त शेतकरी बांधवानी आज सकाळी साडे अकरा वाजता शहरातील बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निर्यात बंदी तात्काळ उठवावी अन्यथा यापेक्षाही मोठे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार बी. ए. कापसे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती रविंद्र देवरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख शितलकुमार अिहरे, किसान सभा सेक्र ेटरी मोहन जाधव, बाजार समतिी संचालक हरिभाऊ पगार, विष्णु बोरसे, रामा पाटील, गजेंद्र पवार, सचिन वाघ, भरत शिंदे, राकेश आहेर, विनोद जाधव देवा पाटील, संदिप वाघ, बाळासाहेब शेवाळे, विलास रौंदळ, सुभाष पगार, नितीन खैरणार, भिला पाटील, नितीन शिरसाठ, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण कर्ज माफी न केल्याने आजही शेतकर्यांचे कर्ज तसेच आहे. आता भाव वाढीमुळे दोन पैसे मिळाल्याने शेतकर्यांच्या घरी सुख व आनंदाने दिवाळी साजरी होणार होती मात्र निर्यात बंदी मुळे बाजार पेठा बंद पडल्या आहेत. कांदा निर्यात तात्काळ उठवावी अन्यथा शेतकरी पेटून उठेल. व त्याचे परिणाम राज्यातील सरकारला विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील . स्थानक परिसरात- देविदास पवार, प्रदेश उपाध्यक्ष, शेतकरी संघटना.केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी करून रडीचा डाव खेळला आहे. मागच्या वर्षी कांद्याचे भाव कवडीमोल झाले शेतकर्यांनी लाखो रु पये खर्च करून पिकविलेला कांदा उकिरड्यावर फेकला त्यावेळी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार कुठे होते. आता शेतकर्याला दोन पैसे मिळत असतांना निर्यात बंदी करून शेतकर्यांचे कंबरडे मोडत आहे.- महेंद्र हिरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी