शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

अनावश्यक मानपान अनाठायी खर्चाला फाटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 6:16 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने गावात डीजे, फेटा, दारु या खर्चाला अनावश्यक खर्च ठरवुन गावात मिरवणुक, वरात, फेटा, दारुला बंदी करु न ऐतिहासिक निर्णय गावविकासासाठी घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देतळवाडे ग्रामसभा : ठरावाविरु ध्द प्रयत्न केल्यास २१ हजार रु पये दंडाची शिक्षा

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने गावात डीजे, फेटा, दारु या खर्चाला अनावश्यक खर्च ठरवुन गावात मिरवणुक, वरात, फेटा, दारुला बंदी करु न ऐतिहासिक निर्णय गावविकासासाठी घेण्यात आला आहे.तळवाडे येथे लग्नाची मिरवणुक वरात लग्नात फेटे,दारु अशा कोणत्याही फालतु अशा अनावश्यक खर्चालाच बंदी करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह गावातील प्रमुख व युवा कार्यकर्ते देखील उपस्थित होते.कोणत्याही धार्मिक कार्यात शाल, टोपी घेण्या-देण्यास बंदीचा ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. सदर ठराव न पाळल्यास २१ हजार रु पये दंडाची शिक्षा निश्चित करण्यात आली.तळवाडे गावात आता नवरदेवाची मिरवणूक निघणार नाही की, डिजे सारखे जास्त आवाजाचे वाद्यही वाजणार नाही. विवाहासाठी आलेल्या वºहाडी मंडळींना फेटे बांधले जाणार नाहीत. एवढेच नव्हे तर संध्याकाळच्या वरातीसह हळदीला जाताना नवरदेवाची मिरवणूक देखील निघणार नाही. असा अभूतपूर्व निर्णय तळवाडे ग्रामस्थांनी ‘गावविकास’ बैठकीमध्ये घेतला आहे. त्याचे उत्स्फूर्तपणे सर्वांनी स्वागत केले आहे.मंगळवारी ग्रामस्थांची ‘गावविकास’ सभा झाली. त्या हा ठराव मंजूर करण्यात आला.यावेळी सरपंच ज्ञानेश्वर भिवसेन, उपसरपंच संतोष बोडके, चेअरमन मोहन बोडके, माजी सरपंच रोहिदास बोडके, बाळू बोडके, व्हा.चेअरमन समाधान आहेर, महीपत बोडके, शिवाजी कसबे, तानाजी बोडके, भास्कर बोडके, युवराज बोडके, ज्ञानेश्वर गांगुर्डे, निवृत्ती भिवसेन, मिहपत बोडके, केरु आहेर, शरद बोडके, गणपत आहेर, गंगाराम आहेर, वाळू बोडके, वामन बोडके, भाऊसाहेब गांगुर्डे, प्रकाश बोडके, संजय बोडके, शिवाजी बोडके पोलीस ठाण्याचे संजय खैरनार, आप्पा काकड, भाबड आदी उपस्थित होते.एक गाव एक गणपतीचा ठराव...गावात विविध ठिकाणी गणपती सोबत नवरात्री उत्सव, करण्यात येतो त्यामुळे यावर उपाय म्हणून तळवाडे येथे एक गाव एकच उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गावात फक्त यापुढे गणपती, नवरात्री उत्सव, शिव जयंती, आंबेडर जयंती यावेळीच फक्त एकच मिरवणुक काढण्यात येणार आल्याचा ठराव यावेळी करण्यात आला. व तश्या आशयाचा ठराव पोलिस स्टेशनला देण्यात आला.............ग्रामीण भागात मानपाना मुळे सर्वसामान्य गरीब शेतकरी अडचणीत आलेले आहेत. अशावेळी सामाजिक भान जपत लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळायला हवा. दारुमुळे चांगल्या कार्यात नाहक वाद काढले जातात. त्यात डीजे असल्यावर तर दारु च्या नादात लग्नसमारंभ वेळेवर पार पडत नाहीत. ते वेळेवर पार पाडण्या साठी सर्व समाज बांधवांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याने अनावश्यक खर्चावर कात्री लावण्याचा निर्णय सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने घेण्यात आला आहे.संतोष बोडके,उपसरपंच.