शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मनपात समावेश, तरी गावांच्या समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:13 IST

नाशिक : कॅनॉलरोडवरील आम्रपाली झोपडपट्टी परिसरात विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात डासांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला ...

नाशिक : कॅनॉलरोडवरील आम्रपाली झोपडपट्टी परिसरात विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात डासांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय परिसरात स्वच्छता होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या परिसरातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

क्लासेसला परवानगी मिळाल्याने दिलासा

नाशिक : खासगी क्लास सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. मागील ९ महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून क्लास करावा लागत आहे. क्लास सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण होणार का, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

वाढत्या गुन्हेगारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे शहर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात दिवसागणिक सोनसाखळी ओढण्याबरोबरच मोबाइल चोरीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याने पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणे

नाशिक : शहरातील विविध मार्गांवर पुन्हा अतिक्रमणे वाढू लागली असून, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होताेच, शिवाय पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते. मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने ही अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

भद्रकाली, दूधबाजारात वाहतूक कोंडी

नाशिक : भद्रकाली, दूधबाजार परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या भागात सतत वाहनांची वर्दळ असते. अरुंद रस्त्यांवरच उभे राहणारे, विविध वस्तू विकणारे विक्रेते आणि दुकानांसमोर उभी करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता अधिकच अरुंद होतो. यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त

नाशिक : शहरालगतच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानानंतर उमेदवार आणि कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. यावेळी ग्रामपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढीव मतदानाचा फायदा कुणाला होणार, याबाबतची गणिते कार्यकर्त्यांकडून मांडली जात आहेत.