शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अगोदरच मंदीचा फटका, त्यात महावितरणचा झटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 15:23 IST

औद्योगिक क्षेत्रावर आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले आहेत. वर्कलोड कमी झाल्याने कामगार कापतीबरोबरच खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे

ठळक मुद्देथकबाकी नसताना पुरवठा खंडीत : उद्योजकांमध्ये नाराजीआर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : थकबाकीदार नसतांनाही महावितरणचे कर्मचारी औद्योगिक ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उद्योजक आर्थिक मंदीचा सामना करता करता नाकी नऊ आलेले आहेत. त्यात महावितरण नाहक त्रास देत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

औद्योगिक क्षेत्रावर आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने उद्योजक धास्तवले आहेत. वर्कलोड कमी झाल्याने कामगार कापतीबरोबरच खर्च कमी करण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत उद्योजक असतांना महावितरण कंपनीचे कर्मचारी थकबाकीदार नसतांनाही विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी देत आहेत. वीज देयक आल्यानंतर मुदतीत देयक भरले नाही तर दंड आकारणी केली जाते. हा नियम आहे. पहिले देयक आल्यानंतर जोपर्यंत दुसरे देयक दिले जात नाही तोपर्यंत त्या ग्राहकास थकबाकीदार म्हणता येत नसल्याचे औद्योगिक ग्राहकांचे म्हणणे आहे. परंतु देयकाची मुदत संपल्यानंतर लगेच थकबाकीदार घोषित करणे चुकीचे आहे. दंड भरण्याची तयारी असतांना विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली जात आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि ग्राहकांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक