शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

साहित्यिकाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व भाषांनी आवाज उठवावा :  जावेद आख्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 1:44 AM

सक्षम लोकशाहीसाठी ज्याप्रमाणे संसद, शासन, विरोधक आवश्यक असतात. त्याचप्रमाणे सत्य बोलणारे, स्वतंत्र बाण्याने लिहिणारे साहित्यिकही गरजेचे असतात. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी साहित्यिकांकडे स्वातंत्र्य असायलाच हवे. तसेच त्यासाठी सर्व भाषांनी एकत्रितपणे आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे रोखठोक प्रतिपादन प्रख्यात कवी जावेद आख्तर यांनी केले.

नाशिक : सक्षम लोकशाहीसाठी ज्याप्रमाणे संसद, शासन, विरोधक आवश्यक असतात. त्याचप्रमाणे सत्य बोलणारे, स्वतंत्र बाण्याने लिहिणारे साहित्यिकही गरजेचे असतात. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी साहित्यिकांकडे स्वातंत्र्य असायलाच हवे. तसेच त्यासाठी सर्व भाषांनी एकत्रितपणे आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे रोखठोक प्रतिपादन प्रख्यात कवी जावेद आख्तर यांनी केले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अख्तर बोलत होते. यावेळी बोलताना अख्तर यांनी लेखक जोपर्यंत काल्पनिक लिहतो, सूर्य, चंद्र, तारे, प्रेम, प्रेयसी यांच्याबाबत लिहित असतो, तोपर्यंत त्याचे कौतुक होते. तोपर्यंत तो सर्वांना चांगला वाटतो. मात्र तो सत्य लिहायला, शब्दांतून वास्तव मांडायला लागला की त्याला वाईट ठरवले जात, सध्याच्या जगात तर त्याला राष्ट्रविरोधी ठरवले जाते. राज्यकर्ते आणि लोकांना काल्पनिक लिहिलेले आवडते. मात्र रस्त्यावरील लढाई लढणारे आणि प्रश्न उपस्थित करणारे कवी, साहित्यिक नको असतात. सध्या सत्य लिहिणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. साहित्यिकांनी प्रेमकथा लिहिण्याऐवजी सत्य आणि हक्कासाठी लेखन केले पाहिजे. साहित्यिकांनी कोणताही विचार न करता , पक्षनिष्ठा पाळत न बसता केवळ देशहितासाठी लिहिले पाहिजे. अशा संमेलनांतून नागरिकांनी देशातील विविध भाषांतील मोठे लेखक, कवींना बोलावून काय लिहित आहात याबाबत विचारणा करण्याची गरज असल्याचे अख्तर यांनी सांगितले.

 

नदीत उभे असताना पाणी आवडत नाही म्हणजे ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे साहित्य आणि राजकारणाचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

इन्फो

१९३६च्या खऱ्या ठरावाची गरज

१९३६ साली स्थापन झालेल्या प्रागअेसिव्ह रायटर्स या सर्व भाषांच्या लेखकांच्या संस्थेत एक ठराव करण्यात आला होता. आम्ही आता फुले, तारे, प्रेमाच्या गोष्टी करणार नसून केवळ देशहिताच्या, सामाजिक समता आणण्याच्या आणि नारीच्या उद्धारासाठीच लेखणी झिजवण्याचा ठराव करण्यात आला होता. त्या ठरावाची खरी आज आहे. ‘जो बात कहते डरते है सब, तू वो बात लिख, इतनी अंधेरी न थी कभी पहले रात कभी’ असे म्हणत अख्तर यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

----

इन्फो

मराठीची स्त्री साहित्य परंपरा सर्वात जुनी

महाराष्ट्रात ८०० वर्षांपूर्वी संत मुक्ताबाई यांनी लेखन केले. त्यांना त्या काळात स्वातंत्र्य होते, यावरून मराठीची समृद्धता लक्षात येते. मात्र दोनशे-तीनशे वर्षांपूर्वीही युरोप आणि अमेरिकेत महिलांना लिहिण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे बऱ्याच महिला साहित्यिक पुरुषांच्या नावे लिखाण करावे लागत होते. त्यांना त्या काळी युरोपातील अनेक मोठमोठ्या साहित्यिकांनी त्यास आक्षेप घेतला होता. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर महाराष्ट्र आणि मराठी किती जुन्या काळापासून प्रागतिक आहेत, ते दिसून येत असल्याचे अख्तर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकJaved Akhtarजावेद अख्तर