शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

अखिल की आखिल होईना बोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 00:46 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय अभिजात साहित्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे प्रत्येक कार्य हे तितक्याच गांभिर्याने होणे अपेक्षित असते. मात्र, शनिवारी जेव्हा संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोधचिन्हावर दोन ठिकाणी असलेला उल्लेख खालील बाजूस अखिल तर वरील बाजूस आखिल असा करण्यात आल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसाहित्य संमेलन : बोधचिन्हात दोन ठिकाणी भिन्न उल्लेखाने चर्चेला बहर

धनंजय रिसोडकरनाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय अभिजात साहित्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे प्रत्येक कार्य हे तितक्याच गांभिर्याने होणे अपेक्षित असते. मात्र, शनिवारी जेव्हा संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोधचिन्हावर दोन ठिकाणी असलेला उल्लेख खालील बाजूस अखिल तर वरील बाजूस आखिल असा करण्यात आल्याचे दिसून आले.

जे बोधचिन्ह संपूर्ण राज्यात, देशात आणि समाजमाध्यमांतून संपूर्ण विश्वात पोहोचणार आहे, त्या संमेलनातील बोधचिन्हच जर शुद्धलेखनाचे तारतम्य ना? बाळगता होत असेल, तर त्या संमेलनातील पुढील व्यापात मराठी भाषेचाच तर बोजवारा उडणार नाही ना? अशी आशंका साहित्यप्रेमींच्या मनी आल्यास आणि त्यातून नक्की काय बोध घ्यायचा, असा प्रश्न रसिकांच्या मनात आल्यास नवल नाही.नाशिकमध्ये २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची गत आठवडाभरापासूनच सर्व रसिक वाट बघत होते. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण शनिवारी करण्यात आले. संमेलनाचे बोधचिन्ह हा त्या संमेलनाचा चेहरा मानला जातो. त्यामुळे त्या बोधचिन्हाच्या निर्मितीसाठी स्पर्धा घेऊन राज्यभरातील कलाकारांना आवाहन करण्यात आले, त्यानुसार ते तयार होणे आणि सर्व कलाकारांच्या प्रवेशिका पोहोचल्यानंतर त्यांचे योग्य ते परीक्षण होण्यासाठी काही कालावधी हा निश्चितपणे लागणार होता. त्यामुळे संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्षांच्या निवडीपर्यंतदेखील बोधचिन्हाचे अनावरण झाले नसले तरी गुणवत्तापूर्ण कार्यासाठी हा विलंब साहजिकच आहे, असेच मानले गेले. मात्र, या बोधचिन्हाचे अनावरण करून ते सर्व प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी या बोधचिन्हाच्या निवड समितीने तसेच आयोजक संस्थेच्या धुरीणांनी त्या चिन्हाचे बारकाईने निरीक्षण करणे अपेक्षित होते.इन्फोमूळ बोधचिन्हाला नंतर जोडसाहित्य संमेलनाच्या मूळ बोधचिन्हात खालील बाजूस एकदाच ह्यअखिलह्णचा उल्लेख असून तो योग्यदेखील होता. मात्र, त्यानंतर त्यात आयोजक संस्थेचे नाव बोधचिन्हाच्या वरील भागात जोडण्यात आले आहे. ते करताना त्या ठिकाणी लिहिलेला ह्यआखिलह्य हा शब्द साहित्यप्रेमींना नक्कीच खटकणारा आहे.इन्फोह्यमहाह्णदेखील गायबया बोधचिन्हाला नंतर वरील भागात जोड देताना अखिल भारतीय मराठी साहित्य ह्यमहाह्णमंडळ असा उल्लेख अपेक्षित असताना प्रत्यक्षात नव्याने करण्यात आलेल्या बोधचिन्हात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यातील ह्यमहाह्ण शब्दच गायब झाल्याचे चाणाक्ष वाचकाच्या नजरेतून सुटत नाही. मूळ बोधचिन्हाला जोड देताना त्यात अशी घिसाडघाई करून संमेलनाच्या बोधचिन्हातच चुका करणे अक्षम्य ठरते.फोटो३०बोधचिन्ह३०बोधचिन्ह २

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळNashikनाशिक