शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अखिल की आखिल होईना बोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 00:46 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय अभिजात साहित्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे प्रत्येक कार्य हे तितक्याच गांभिर्याने होणे अपेक्षित असते. मात्र, शनिवारी जेव्हा संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोधचिन्हावर दोन ठिकाणी असलेला उल्लेख खालील बाजूस अखिल तर वरील बाजूस आखिल असा करण्यात आल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसाहित्य संमेलन : बोधचिन्हात दोन ठिकाणी भिन्न उल्लेखाने चर्चेला बहर

धनंजय रिसोडकरनाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय अभिजात साहित्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे प्रत्येक कार्य हे तितक्याच गांभिर्याने होणे अपेक्षित असते. मात्र, शनिवारी जेव्हा संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोधचिन्हावर दोन ठिकाणी असलेला उल्लेख खालील बाजूस अखिल तर वरील बाजूस आखिल असा करण्यात आल्याचे दिसून आले.

जे बोधचिन्ह संपूर्ण राज्यात, देशात आणि समाजमाध्यमांतून संपूर्ण विश्वात पोहोचणार आहे, त्या संमेलनातील बोधचिन्हच जर शुद्धलेखनाचे तारतम्य ना? बाळगता होत असेल, तर त्या संमेलनातील पुढील व्यापात मराठी भाषेचाच तर बोजवारा उडणार नाही ना? अशी आशंका साहित्यप्रेमींच्या मनी आल्यास आणि त्यातून नक्की काय बोध घ्यायचा, असा प्रश्न रसिकांच्या मनात आल्यास नवल नाही.नाशिकमध्ये २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची गत आठवडाभरापासूनच सर्व रसिक वाट बघत होते. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण शनिवारी करण्यात आले. संमेलनाचे बोधचिन्ह हा त्या संमेलनाचा चेहरा मानला जातो. त्यामुळे त्या बोधचिन्हाच्या निर्मितीसाठी स्पर्धा घेऊन राज्यभरातील कलाकारांना आवाहन करण्यात आले, त्यानुसार ते तयार होणे आणि सर्व कलाकारांच्या प्रवेशिका पोहोचल्यानंतर त्यांचे योग्य ते परीक्षण होण्यासाठी काही कालावधी हा निश्चितपणे लागणार होता. त्यामुळे संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्षांच्या निवडीपर्यंतदेखील बोधचिन्हाचे अनावरण झाले नसले तरी गुणवत्तापूर्ण कार्यासाठी हा विलंब साहजिकच आहे, असेच मानले गेले. मात्र, या बोधचिन्हाचे अनावरण करून ते सर्व प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी या बोधचिन्हाच्या निवड समितीने तसेच आयोजक संस्थेच्या धुरीणांनी त्या चिन्हाचे बारकाईने निरीक्षण करणे अपेक्षित होते.इन्फोमूळ बोधचिन्हाला नंतर जोडसाहित्य संमेलनाच्या मूळ बोधचिन्हात खालील बाजूस एकदाच ह्यअखिलह्णचा उल्लेख असून तो योग्यदेखील होता. मात्र, त्यानंतर त्यात आयोजक संस्थेचे नाव बोधचिन्हाच्या वरील भागात जोडण्यात आले आहे. ते करताना त्या ठिकाणी लिहिलेला ह्यआखिलह्य हा शब्द साहित्यप्रेमींना नक्कीच खटकणारा आहे.इन्फोह्यमहाह्णदेखील गायबया बोधचिन्हाला नंतर वरील भागात जोड देताना अखिल भारतीय मराठी साहित्य ह्यमहाह्णमंडळ असा उल्लेख अपेक्षित असताना प्रत्यक्षात नव्याने करण्यात आलेल्या बोधचिन्हात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यातील ह्यमहाह्ण शब्दच गायब झाल्याचे चाणाक्ष वाचकाच्या नजरेतून सुटत नाही. मूळ बोधचिन्हाला जोड देताना त्यात अशी घिसाडघाई करून संमेलनाच्या बोधचिन्हातच चुका करणे अक्षम्य ठरते.फोटो३०बोधचिन्ह३०बोधचिन्ह २

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळNashikनाशिक