शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Maharashtra Election 2019: अजित पवारांच्या राजीनाम्याने शरद पवारांचा ‘टेंपो’ खाली आणला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 05:36 IST

छगन भुजबळ : १९९९ मध्ये वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे दिले होते आश्वासन Maharashtra Election 2019:

- राजा मानेयेवला (नाशिक) : ईडीच्या संदर्भात शरद पवार यांनी पुकारलेल्या आंदोलनाने उच्च ‘टेंपो’ गाठला होता. अजित पवारांच्या राजीनाम्याने सगळा ‘फोकस’ दुसरीकडे वळला आणि शरद पवारांनी आंदोलनाने उभा केलेला जनमानसाचा ‘टेंपो’ खाली आला. अजित पवारांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नव्हती पण तो त्यांनी दिला, असे उद्विग्न उद्गार राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना काढले.छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला या मतदारसंघात त्यांची भेट घेतली.

सर्व विरोधक एकवटल्याने निवडणूक तुम्हाला जड चाललीय म्हणे!...अहो, सोप्पी म्हणा! उलट मला निवडणूक सोपी झालीय. कारण मतदारांना विकास आणि माझे काम कळते.पण राष्टÑवादी काँग्रेसच्या राज्याच्या प्रचारापासून तुम्ही अलिप्तच का दिसता?नाशिक जिल्ह्यावर सध्या मी लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे १५ उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीला लागलो आहे. त्यामुळे राज्यात अजून फिरायला सुरुवात केलेली नाही. पण लवकरच करणार आहे.राष्टÑवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले. तुम्हीदेखील निघाल्याची चर्चा होती. तुम्ही गेला नाहीत की त्यांनीच तुम्हाला घेतले नाही?ही सगळी चर्चा तुम्ही मीडियावाल्यांनी घडवून आणली. बाकी मी आहे तिथेच आहे!सुशीलकुमार शिंदेंसारखा ज्येष्ठ काँग्रेस नेता राष्टÑवादीचे काँगे्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे अशी भावना व्यक्त करतो, तुमची काय भावना?आज त्या विषयाला महत्त्व नाही. अजित पवारांचा राजीनामा असेल नाही तर हा विलनीकरणाचा विषय विरोधी पक्षाचा ‘फोकस’ बदलण्याचा प्रयत्न सतत काही मंडळी करताहेत!शरद पवारांसारखा नेता ‘वन मॅन आर्मी’ शैलीत राज्यभर फिरतोय. बाकी नेत्यांचे काय?नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघ असून त्यापैकी १० राष्ट्रवादीलाआणि पाच काँग्रेसला सुटलेले आहेत. १५ पैकी आघाडीचे किमान १२ आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. शेवटी आमदार निवडून आणणे महत्त्वाचे असून या १५ आमदारांचा आपण प्रचार करत आहे. तसेच १४ आॅक्टोबरला महाराष्ट्रातील कर्जत, वैजापूर या मतदार संघात जाणार आहे.शरद पवारांवर ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला तर अजित पवारांनी राजीनामा दिला. तुम्ही संकटात असताना तुमच्या मदतीला पक्षाचे कोण आले?राष्टÑवादी काँग्रेस पक्ष माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला. शरद पवार आणि आम्ही सर्वजण पक्ष बांधणीसाठी सतत कार्यरत राहूच.राज ठाकरे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडणूक द्या म्हणतात मग विरोधी पक्षाची राष्टÑवादीची संधी जाणारच म्हणायचं का?हो! राष्टÑवादीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे विरोधात बसायचा प्रश्नच नाही.आघाडी सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक करणे ही चूक होती व ती एका ज्येष्ठ नेत्याच्या दबावामुळे घडली, असे अजित पवार एका मुलाखतीत म्हणाले आहे. ते ज्येष्ठ नेते तुम्हीच तर नाही ना?खरं तर १९९९ मध्ये ज्यावेळी आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी उतरलो, त्यावेळी आमच्या वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, असं होतं. १९९५ मध्ये जेव्हा युतीचं सरकार होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरुद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच ठेवण्यात आली होती. ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी माझी देखील स्थिती झाली होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. मात्र हा मुद्दा आता संपला आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019