शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कमी मार्क मिळवूनही अजित पवार गुणवत्ता यादीत

By श्याम बागुल | Updated: February 1, 2020 20:34 IST

नाशिक मुक्कामी तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची ही पहिलीच भेट असल्याने त्यांच्यासोबत भल्या पहाटे शपथविधी सोहळ्यासाठी हजर असलेल्या व नंतर परत माघारी फिरलेल्या नाशिकमधील राष्टवादीच्या आमदारांना हर्षाेल्हास होणे

ठळक मुद्देअजित पवार यांनी त्यावेळी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला होता याचे कोडेअजित पवार यांनी जे काही व्यावहारिक ज्ञानाचे गणित मांडले

श्याम बागुलपरीक्षेत कमी मार्क मिळवूनही निव्वळ व्यवहारी ज्ञान नसल्यामुळे गुणवत्ता यादीत आलेल्यांनाही मागे रहावे लागते, असा स्वानुभव कथन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांची करमणूक करून भाजपला व पर्यायाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला असला तरी, पाठीशी बोटावर मोजण्याइतपत आमदारांचे पाठबळ असतानाही चक्क भाजपच्या मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्रिपदाची भल्या पहाटे शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना त्यावेळी कोणते व्यावहारिक ज्ञान होते हे सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असतानाही स्पष्ट होऊ शकलेले नाही. एक मात्र खरे भाजपशी सत्तास्थापन करण्यासाठी हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात स्वपक्षातून पहिल्यांदाच निषेधाचे मोठ्या प्रमाणात सूर निघू लागल्यानंतर पवार यांना आपल्यातील व्यावहारिक ज्ञानाची तत्काळ प्रचिती आली असावी व त्यातूनच त्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला असावा, असा अर्थ त्यातून काढण्यास हरकत नसावी.

उत्तर महाराष्टच्या विकासाच्या दृष्टीने आगामी वर्षाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी अजित पवार हे दोन दिवस नाशिक मुक्कामी तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची ही पहिलीच भेट असल्याने त्यांच्यासोबत भल्या पहाटे शपथविधी सोहळ्यासाठी हजर असलेल्या व नंतर परत माघारी फिरलेल्या नाशिकमधील राष्टÑवादीच्या आमदारांना हर्षाेल्हास होणे स्वाभाविकच होते. त्यामुळे अजित पवार यांच्याभोवती स्थानिक राजकारण्यांचे कोंडाळे जमलेले असताना राज्यात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसतानाही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे व ५४ आमदार असलेल्या राष्टवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणे यावर चर्चा होणे अपेक्षित होते. त्यामुळे परीक्षेत कमी मार्क मिळविणारा व्यवहारात हुशार असतो त्यामुळे तो पुढे जातो. जास्त मार्कवाला नुसता डोक्यानेच जास्त, पण व्यवहारात कमी असतो. व्यावहारिक ज्ञानामुळे आम्ही सत्तेत असल्याचे विधान करून अजित पवार यांनी भाजपला अज्ञानी ठरविले. मात्र भाजपला जास्त मार्क मिळालेले माहिती असतानाही अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करून भल्या पहाटे शपथविधी उरकून घेतला. परंतु ज्या सहकाऱ्यांच्या बळावर पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यांनी अवघ्या तीन तासात घूमजाव करून पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्वत:ला कमी मार्क मिळूनही व्यावहारिक ज्ञान अधिक असल्याचा दावा करणा-या अजित पवार यांना अवघ्या ८२ तासांत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यावेळी त्यांच्या व्यावहारिक ज्ञानाची प्रचिती अवघ्या देशाला आली. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवसांचा कालावधी जवळ आलेला असतानाही अद्यापही अजित पवार यांनी त्यावेळी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला होता याचे कोडे उलगडलेले नाही. नाशिक मुक्कामी बोलताना मात्र अजित पवार यांनी जे काही व्यावहारिक ज्ञानाचे गणित मांडले ते पाहता, जास्त गुण मिळविणा-या भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना नुसताच डोक्याने विचार केला. तर पवार यांनी त्यांच्या सोबत जाताना व्यावहारिक ज्ञानाचा वापर करून भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्यात त्यात ‘भाजप नको’ या एकमेव विचाराने शिवसेना, राष्टवादी व कॉँग्रेसला तातडीने एकत्र यावे लागले व त्यातून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, असा त्यातून अर्थ निघत असेल तर अजित पवार यांना असलेले व्यावहारिक अगाध ज्ञान काका शरद पवार यांनाही ज्ञात नसावे असे मानावे काय? एकमात्र खरे पाठीशी आठ ते दहा आमदारांचे (म्हणजेच कमी गुण) असतानाही थेट भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेणा-या अजित पवार यांच्यावर बंडखोरी केल्याबद्दल कारवाई होण्याऐवजी महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्रिपद बहाल करून त्यांच्यातील कमी गुणांचे केलेले कौतुक एकमेव राष्टवादी कॉँग्रेस पक्षातच होऊ शकते हे निश्चित !

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस