शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कमी मार्क मिळवूनही अजित पवार गुणवत्ता यादीत

By श्याम बागुल | Updated: February 1, 2020 20:34 IST

नाशिक मुक्कामी तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची ही पहिलीच भेट असल्याने त्यांच्यासोबत भल्या पहाटे शपथविधी सोहळ्यासाठी हजर असलेल्या व नंतर परत माघारी फिरलेल्या नाशिकमधील राष्टवादीच्या आमदारांना हर्षाेल्हास होणे

ठळक मुद्देअजित पवार यांनी त्यावेळी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला होता याचे कोडेअजित पवार यांनी जे काही व्यावहारिक ज्ञानाचे गणित मांडले

श्याम बागुलपरीक्षेत कमी मार्क मिळवूनही निव्वळ व्यवहारी ज्ञान नसल्यामुळे गुणवत्ता यादीत आलेल्यांनाही मागे रहावे लागते, असा स्वानुभव कथन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांची करमणूक करून भाजपला व पर्यायाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला असला तरी, पाठीशी बोटावर मोजण्याइतपत आमदारांचे पाठबळ असतानाही चक्क भाजपच्या मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्रिपदाची भल्या पहाटे शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना त्यावेळी कोणते व्यावहारिक ज्ञान होते हे सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असतानाही स्पष्ट होऊ शकलेले नाही. एक मात्र खरे भाजपशी सत्तास्थापन करण्यासाठी हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात स्वपक्षातून पहिल्यांदाच निषेधाचे मोठ्या प्रमाणात सूर निघू लागल्यानंतर पवार यांना आपल्यातील व्यावहारिक ज्ञानाची तत्काळ प्रचिती आली असावी व त्यातूनच त्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला असावा, असा अर्थ त्यातून काढण्यास हरकत नसावी.

उत्तर महाराष्टच्या विकासाच्या दृष्टीने आगामी वर्षाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी अजित पवार हे दोन दिवस नाशिक मुक्कामी तळ ठोकून होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांची ही पहिलीच भेट असल्याने त्यांच्यासोबत भल्या पहाटे शपथविधी सोहळ्यासाठी हजर असलेल्या व नंतर परत माघारी फिरलेल्या नाशिकमधील राष्टÑवादीच्या आमदारांना हर्षाेल्हास होणे स्वाभाविकच होते. त्यामुळे अजित पवार यांच्याभोवती स्थानिक राजकारण्यांचे कोंडाळे जमलेले असताना राज्यात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसतानाही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे व ५४ आमदार असलेल्या राष्टवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणे यावर चर्चा होणे अपेक्षित होते. त्यामुळे परीक्षेत कमी मार्क मिळविणारा व्यवहारात हुशार असतो त्यामुळे तो पुढे जातो. जास्त मार्कवाला नुसता डोक्यानेच जास्त, पण व्यवहारात कमी असतो. व्यावहारिक ज्ञानामुळे आम्ही सत्तेत असल्याचे विधान करून अजित पवार यांनी भाजपला अज्ञानी ठरविले. मात्र भाजपला जास्त मार्क मिळालेले माहिती असतानाही अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करून भल्या पहाटे शपथविधी उरकून घेतला. परंतु ज्या सहकाऱ्यांच्या बळावर पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यांनी अवघ्या तीन तासात घूमजाव करून पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्वत:ला कमी मार्क मिळूनही व्यावहारिक ज्ञान अधिक असल्याचा दावा करणा-या अजित पवार यांना अवघ्या ८२ तासांत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यावेळी त्यांच्या व्यावहारिक ज्ञानाची प्रचिती अवघ्या देशाला आली. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवसांचा कालावधी जवळ आलेला असतानाही अद्यापही अजित पवार यांनी त्यावेळी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला होता याचे कोडे उलगडलेले नाही. नाशिक मुक्कामी बोलताना मात्र अजित पवार यांनी जे काही व्यावहारिक ज्ञानाचे गणित मांडले ते पाहता, जास्त गुण मिळविणा-या भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना नुसताच डोक्याने विचार केला. तर पवार यांनी त्यांच्या सोबत जाताना व्यावहारिक ज्ञानाचा वापर करून भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्यात त्यात ‘भाजप नको’ या एकमेव विचाराने शिवसेना, राष्टवादी व कॉँग्रेसला तातडीने एकत्र यावे लागले व त्यातून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, असा त्यातून अर्थ निघत असेल तर अजित पवार यांना असलेले व्यावहारिक अगाध ज्ञान काका शरद पवार यांनाही ज्ञात नसावे असे मानावे काय? एकमात्र खरे पाठीशी आठ ते दहा आमदारांचे (म्हणजेच कमी गुण) असतानाही थेट भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेणा-या अजित पवार यांच्यावर बंडखोरी केल्याबद्दल कारवाई होण्याऐवजी महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्रिपद बहाल करून त्यांच्यातील कमी गुणांचे केलेले कौतुक एकमेव राष्टवादी कॉँग्रेस पक्षातच होऊ शकते हे निश्चित !

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस