अहिंसा परमो धर्म:
By Admin | Updated: April 19, 2016 22:39 IST2016-04-19T22:13:46+5:302016-04-19T22:39:08+5:30
अहिंसा परमो धर्म:

अहिंसा परमो धर्म:
नांदगाव : श्री महावीर भगवान यांच्या २६१५व्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे आर्यिका श्री १०५ सौहार्दमती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ६ वाजता प्रभातफेरी काढण्यात येऊन ज.ता.का. जैन धर्मशाळेत झेंडावंदन करण्यात आले. फेरीत ओसवाल, श्वेतांबर व दिगंबर जैन समाज सहभागी झाले होते. त्यानंतर भगवान महावीरांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात आला. १० वाजेपासून आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नाटिका व नृत्य सादर करण्यात आले.
दुपारी २ वाजता शहरातून दुचाकीद्वारे फेरी काढण्यात आली. साडेतीन वाजता महावीरांच्या मूर्ती असलेल्या भव्य पालखीची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वंदे वीरम् व महावीर भगवान की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
आर्यिका श्री १०५ सौहार्दमती माताजींचे प्रवचन झाले. त्यांनी भगवान महावीरांनी उपदेश केलेल्या मार्गावरून चालण्याचे आवाहन केले. तसेच विश्व हे एक कुटुंब असून, आयुष्याच्या बागेत, करुणारूपी जलाचे सिंंचन करा. शुभचिंत्ांन करा. दु:खी व पीडित मनांना आधार द्या. दुसऱ्यांचे दु:ख निवारण करेल तोच खरा महावीर. जीवनाचे सार हेच आहे, असे सांगितले.
मिरवणुकीत पुरुषांनी सफेद रंगाचे कपडे घातले होते, तर महिलांनी लाल रंगाचे ठिपके असलेल्या साड्या परिधान केल्या होत्या. दुहेरी रांग करून शिस्तबद्ध संचलनात लहान मुलेही सहभागी झाली होती. घरांवर रंगीत झेंडे लावण्यात आले होते.
अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ५५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
सायंकाळी भ. महावीरांची मूर्ती चांदीच्या पाळण्यात ठेवण्यात आली. रिवाजाप्रमाणे आयोजित कार्यक्रमात नाव ठेवणे, काजळ घालणे, पाळणा हलविणे, अशा विविध क्रियांसाठी बोली लावून त्या सेवा संबंधिताना मिळाल्या.
खं. दिगंबर जैन पंचायतीचे अध्यक्ष सुशील कासलीवाल, महामंत्री दिलीप सेठी, फुलचंद लोहाडे, कंचनबाई सेठी, मोतीलालजी कासलीवाल, दिलीप कासलीवाल आदिंनी मार्गदर्शन केले.
कैलास कासलीवाल, सुनील पांडे, भरत कासलीवाल, शरद लोहाडे, पीयूष काला, दीपक बडजाते, महावीर पांडे, नूतन कासलीवाल, आनंद काला यांचा आयोजनासाठी सहभाग होता.
या दिवशी जैन समाजातील मंडळी व्यवहार बंद ठेवून संपूर्ण दिवस जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असतात.
सटाणा : शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि अरिहंत ग्रुपतर्फे महावीर जन्मकल्याणक महोत्सव भव्य मिरवणुकीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपप्रवर्तक प.पू. आशिषमुनीजी यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र मास महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे एवं अरिहंत ग्रुपचे अध्यक्ष सचिन बंब, अमित अजमेरा, विनोद पारख, शैलेश कोठारी, डॉ. महावीर पारख, दिनेश शाह व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
मिरवणुकीत संघपती शांतीलालजी राका, अध्यक्ष डॉ. लखीचंदजी ओस्तवाल, मंत्री दिलीपजी टाटिया, उपाध्यक्ष सुभाषचंदजी बंब, शांतीलालजी पारख, नेमीचंदजी बडजाते, डॉ. दिग्विजयजी शाह, रमणलालजी छाजेड, जितेंद्र पहाडे, मनोज कोठारी, कमलेश छाजेड, विनोद अजमेरा, रितेश ठोळे, केतन खिंवसरा, मनोज सोनग्रा, राहुल लोढा, भूषण पारख, महावीर कांकरिया, सागर ठोळे, भूषण लुंकड, प्रवीण भंडारी, आनंद ओस्तवाल, यश छाजेड, चेतन पारख, गौतम मुथा, राकेश राका, डॉ. अभिजित ओस्तवाल, दिनेश कांकरिया, प्रणीत बिनायक्या, निखिल कालवाडीया, प्रतीक छाजेड, निखिल पारख, गौतम पारख आदि सहभागी झाले होते.
(लोकमत ब्युरो)