शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

बीवायके महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्राचार्यांना घेराव, स्नेहसंमेलनासाठी घेतली आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:00 IST

बीवायके वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने हे स्नेहसंमेलनच रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातला.

ठळक मुद्देस्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिकासांस्कृतिक महोत्सव रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोधप्राचार्यांकडून संमेलनाच्या आयोजनाचे आश्वासन

नाशिक  : स्नहेसंमेलन म्हटले की महाविद्यालयीन तरुणाईच्या उत्साहाला उधान येते. परंतु, बीवायके वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने हे स्नेहसंमेलनच रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातला. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली असून हे संमेलन घेण्याची तयारी दाखवल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.महाराष्ट्रात काही दिवसांपर्वी घटलेल्या अनपेक्षित घटनांमुळे वाढलेला तणाव व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसंबधीच्या दु:खद घटनांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे प्रतिनीधी व माजी सचीव भूषण काळे यांच्यासह कमलेश काळे, तेजस कुमावेत, रिद्धी भावसार, प्रणाली शंकपाळ, प्राची वाघमारे, अनुजा सुराणा आदि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध करीत आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.

यापूर्वीही अशाप्रकारे तणावपूर्ण घटना घडल्या असून वेगवेगळ्य़ा दुख:द प्रसंगांमध्येही गेल्या अनेक वर्षापासून महाविद्यालयात स्नेहसंमेलनाची व त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा अखंडीत पणे सुरू आहे. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने वर्षातून एकदा होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातू विद्याथ्र्याना त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असते. परंतु, हे व्यासपीठच हिरावून घेण्याचा घाट महाविद्यालय प्रशासनाने घातल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच स्नेहसंमेलन रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातल्याने अखेर महाविद्यालयाने वार्षिक स्नेहसंमेलन घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.12) हे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे होणार संमेलननाशिकसह राज्यभरात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. त्याचप्रमाणो महाविद्यालयाशी संबधीत कर्मचाऱ्याविषयी दुख:द घटना घडल्याने प्रशासनाने संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, विद्यार्थ्यांनी खुपच आग्रही भूमिका घेऊन संमेलन शांततेत पार पाडण्याचे आश्वसान दिले. त्यामुळे नियमतपणे संमेलन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. -धनेश कलाल,प्राचार्य, बीवायके महाविद्यालय 

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकagitationआंदोलनcollegeमहाविद्यालय