शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीवायके महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्राचार्यांना घेराव, स्नेहसंमेलनासाठी घेतली आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:00 IST

बीवायके वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने हे स्नेहसंमेलनच रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातला.

ठळक मुद्देस्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिकासांस्कृतिक महोत्सव रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोधप्राचार्यांकडून संमेलनाच्या आयोजनाचे आश्वासन

नाशिक  : स्नहेसंमेलन म्हटले की महाविद्यालयीन तरुणाईच्या उत्साहाला उधान येते. परंतु, बीवायके वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने हे स्नेहसंमेलनच रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातला. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली असून हे संमेलन घेण्याची तयारी दाखवल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.महाराष्ट्रात काही दिवसांपर्वी घटलेल्या अनपेक्षित घटनांमुळे वाढलेला तणाव व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसंबधीच्या दु:खद घटनांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे प्रतिनीधी व माजी सचीव भूषण काळे यांच्यासह कमलेश काळे, तेजस कुमावेत, रिद्धी भावसार, प्रणाली शंकपाळ, प्राची वाघमारे, अनुजा सुराणा आदि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध करीत आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.

यापूर्वीही अशाप्रकारे तणावपूर्ण घटना घडल्या असून वेगवेगळ्य़ा दुख:द प्रसंगांमध्येही गेल्या अनेक वर्षापासून महाविद्यालयात स्नेहसंमेलनाची व त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा अखंडीत पणे सुरू आहे. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने वर्षातून एकदा होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातू विद्याथ्र्याना त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असते. परंतु, हे व्यासपीठच हिरावून घेण्याचा घाट महाविद्यालय प्रशासनाने घातल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच स्नेहसंमेलन रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातल्याने अखेर महाविद्यालयाने वार्षिक स्नेहसंमेलन घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.12) हे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे होणार संमेलननाशिकसह राज्यभरात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. त्याचप्रमाणो महाविद्यालयाशी संबधीत कर्मचाऱ्याविषयी दुख:द घटना घडल्याने प्रशासनाने संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, विद्यार्थ्यांनी खुपच आग्रही भूमिका घेऊन संमेलन शांततेत पार पाडण्याचे आश्वसान दिले. त्यामुळे नियमतपणे संमेलन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. -धनेश कलाल,प्राचार्य, बीवायके महाविद्यालय 

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकagitationआंदोलनcollegeमहाविद्यालय