शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

बीवायके महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्राचार्यांना घेराव, स्नेहसंमेलनासाठी घेतली आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:00 IST

बीवायके वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने हे स्नेहसंमेलनच रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातला.

ठळक मुद्देस्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिकासांस्कृतिक महोत्सव रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोधप्राचार्यांकडून संमेलनाच्या आयोजनाचे आश्वासन

नाशिक  : स्नहेसंमेलन म्हटले की महाविद्यालयीन तरुणाईच्या उत्साहाला उधान येते. परंतु, बीवायके वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने हे स्नेहसंमेलनच रद्द करण्याच्या निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातला. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली असून हे संमेलन घेण्याची तयारी दाखवल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.महाराष्ट्रात काही दिवसांपर्वी घटलेल्या अनपेक्षित घटनांमुळे वाढलेला तणाव व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसंबधीच्या दु:खद घटनांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे प्रतिनीधी व माजी सचीव भूषण काळे यांच्यासह कमलेश काळे, तेजस कुमावेत, रिद्धी भावसार, प्रणाली शंकपाळ, प्राची वाघमारे, अनुजा सुराणा आदि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाविद्यालय प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध करीत आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.

यापूर्वीही अशाप्रकारे तणावपूर्ण घटना घडल्या असून वेगवेगळ्य़ा दुख:द प्रसंगांमध्येही गेल्या अनेक वर्षापासून महाविद्यालयात स्नेहसंमेलनाची व त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा अखंडीत पणे सुरू आहे. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने वर्षातून एकदा होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातू विद्याथ्र्याना त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असते. परंतु, हे व्यासपीठच हिरावून घेण्याचा घाट महाविद्यालय प्रशासनाने घातल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच स्नेहसंमेलन रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत प्राचार्य धनेश कलाल यांना घेराव घातल्याने अखेर महाविद्यालयाने वार्षिक स्नेहसंमेलन घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.12) हे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे होणार संमेलननाशिकसह राज्यभरात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. त्याचप्रमाणो महाविद्यालयाशी संबधीत कर्मचाऱ्याविषयी दुख:द घटना घडल्याने प्रशासनाने संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, विद्यार्थ्यांनी खुपच आग्रही भूमिका घेऊन संमेलन शांततेत पार पाडण्याचे आश्वसान दिले. त्यामुळे नियमतपणे संमेलन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. -धनेश कलाल,प्राचार्य, बीवायके महाविद्यालय 

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकagitationआंदोलनcollegeमहाविद्यालय