शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पारधी वस्तीवर पोहचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 6:09 PM

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआदिवासी नागरिकांची साजरी होतेय पहिलीच दिवाळी

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.गावापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर ५० ते ६० लोकसंख्येची वस्ती असलेल्या या परिसरात वीज पन्नास वर्षांपूर्वी वितरित झाली होती. मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून येथील नागरिक अंधारातच राहत होते.येथील नागरिकांनी वीजे संदर्भात वेळोवेळी शासन दरबारी हेलपाटे मारून, निवेदने देऊन व लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडूनही या समस्येकडे दुर्लक्षच होत गेले. निवडणुकीच्या वेळी फक्त आश्वासने मिळत गेली, मात्र तरी येथे महावितरणची वीज पोहोचू शकली नव्हती.पारधी वस्तीवरील नागरिकांनी व येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी विधानसभा निवडणुकीपासून या समस्येच्या संदर्भात वेळोवेळी आमदार माणिक कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती. या समस्येची दखल घेत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून या ठिकाणी वीज पोहचवलीगेल्याने येथील आदिवासी नागरिक समाधान व्यक्त करीत आहे....अन आदिवासींची जणू दिवाळीचगेल्या पन्नास वर्षांपासून पारधी वस्तीवर वीज पोहोचली नसल्याने येथील आदिवासी नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत होती. तसेच विजेवर चालणारी उपकरणे वापरता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती त्यामुळे या ठिकाणी वीज पोहचल्याने येथे पहिलीच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.आमच्या परिसरात गेल्या पन्नास वर्षांपूर्वी च वीज पोहचली होती मात्र आमच्या वस्तीवर महावितरण च्या दुर्लक्षामुळे वीज पोहचत नव्हती आम्ही वेळोवेळी शासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही आज पर्यंत वीज पोहचत नव्हती. या संदर्भात आमदार कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती याची दखल घेत आमच्या वस्तीवर पन्नास वर्षांनंतर वीज पोहोचल्याने आनंद व्यक्त होत आहे.- हिरामण पारधी,

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासelectricityवीज