शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

महाराष्टÑात दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकार कोचींग क्लाससाठी कायदा करणार का?

By संजय पाठक | Published: May 26, 2019 12:11 AM

नाशिक- सुरत येथील एका खासगी कोचींग क्लासेला लागलेल्या आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी इमारतीतून बाहेर पडण्याची कोणतीही संधी नसल्याने विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या घेतल्या त्यात वीस जणांना जीव गमवावा लागला आहे. केवळ सुरतच नाही महाराष्टÑात देखील अशाप्रकारचे शेकडो क्लास असून त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे किंवा नाही हे कोणाला माहिती नाही. इतकेच नव्हे तर खासगी कोचींग क्लासेससाठी राज्य सरकार कायदा करणार असला तरी गेल्या किमान वर्षभरापासून हा कायदा विधानसभेत मंजुरीसाठी पडून आहे. सुरत सारखी एखादी दुर्घटना घडून मुलांचा बळी गेल्यानंतर सरकार कायदा करणार काय असा प्रश्न केला जात आहे.

ठळक मुद्देसुरतमधील दुर्घटनेने उडवली पालकांची झोपक्लास चालक सकारात्मक मात्र शासनच उदासिन

संजय पाठक, नाशिक- सुरत येथील एका खासगी कोचींग क्लासेला लागलेल्या आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी इमारतीतून बाहेर पडण्याची कोणतीही संधी नसल्याने विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या घेतल्या त्यात वीस जणांना जीव गमवावा लागला आहे. केवळ सुरतच नाही महाराष्टÑात देखील अशाप्रकारचे शेकडो क्लास असून त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे किंवा नाही हे कोणाला माहिती नाही. इतकेच नव्हे तर खासगी कोचींग क्लासेससाठी राज्य सरकार कायदा करणार असला तरी गेल्या किमान वर्षभरापासून हा कायदा विधानसभेत मंजुरीसाठी पडून आहे. सुरत सारखी एखादी दुर्घटना घडून मुलांचा बळी गेल्यानंतर सरकार कायदा करणार काय असा प्रश्न केला जात आहे.

खासगी शिकवणी किंवा कोचींग क्लासेस आता शैक्षणिक जीवनातील महत्वाचा घटक ठरला आहे. राज्यात शेकडो कोचींग क्लासेस असून त्यांची नोंद राज्यशासनाकडे किंवा शिक्षण खात्याकडे नाही. कोणत्याही इमारतीत कोणीही व्यक्ती क्लासेस सुरू करू शकतो. त्याला ना शैक्षणिक पात्रतेचे बंधन ना अन्य कोणते नियंत्रण. नाशिकसारख्या ठिकाणीच अशाप्रकारचे सुमारे अडीच हजार क्लासेस आहेत. लाखो मुले या पर्यायी शिक्षण व्यवस्थेचा लाभ घेत असतात. शाळा महाविद्यालयांपेक्षा क्लास महत्वाचे ठरू लागले असून त्यांचे शुल्क इंटरनॅशनल स्कूलच्या तोडीचे म्हणजेच लाखो रूपयांत आहे. परंतु राज्य शासनाकडून त्याचे कोणतेही नियमन होत नाही.

काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने खासगी कोचींग क्लासेससाठी कायदा करण्याचे ठरविल्यानंतर त्याला राज्यभरातील कोचींग क्लास चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या कायद्याच्या प्रारूपानुसार क्लासचालकांची नोंदणी होईलच परंतु ज्या ठिकाणी क्लास चालू आहे, तेथे मुबलक जागा, सीसीटीव्ही, पाणी पुरवठा, वाहनतळ आणि अन्य सुरक्षा नियमांचा अंतर्भाव असणार आहे विधी मंडळाच्या पटलावर हा प्रस्ताव पडून असून गेल्या तीनेक वर्षात तो मंजुर झालेला नाही. त्यामुळे तो नक्की कधी होणार आणि पालकांना सुरक्षीततेची हमी कधी मिळणार असा प्रश्न केला जात आहे. सुरतमध्ये घडलेल्या दुर्घटनेची महाराष्टÑात पुनरावृत्ती झाल्यानंतर कायदा होणार काय असा देखील प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकState Governmentराज्य सरकारfireआग