शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रामकुंडात अष्टोप्रहर शुद्ध पाण्यासाठीही सल्लागार ; कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:08 AM

महापालिकेत कुठलेही काम आता सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा विडा प्रशासनाने उचललेला आहे. आता तर प्रशासनाने चक्क गोदावरीतील रामकुंडात अष्टोप्रहर पाणी कसे शुद्ध राहील व यासाठी काय केले पाहिजे, हा सल्ला मिळविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांवर महापालिकेने कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी ठेवलेली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी रामकुंडात पाणीपुरवठ्यासाठी थेट पाइपलाइन निविदाही मागविण्यात आल्या

नाशिक : महापालिकेत कुठलेही काम आता सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा विडा प्रशासनाने उचललेला आहे. आता तर प्रशासनाने चक्क गोदावरीतील रामकुंडात अष्टोप्रहर पाणी कसे शुद्ध राहील व यासाठी काय केले पाहिजे, हा सल्ला मिळविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांवर महापालिकेने कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी ठेवलेली आहे.  गोदावरी नदीवरील पवित्र मानल्या जाणाºया रामकुंडात शुद्ध व स्वच्छ पाणी राहावे याकरिता महापालिकेने यापूर्वी फिल्ट्रेशन प्लॅँटही बसविला होता. सदर प्रयोग फेल गेल्यानंतर महापालिकेने रामकुंडात पाणीपुरवठ्यासाठी थेट पाइपलाइन टाकली. सद्यस्थितीत रामकुंडातील अमृतकुंभातून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. रामकुंडात स्नानासाठी देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. रामकुंडात कायमस्वरूपी शुद्ध आणि स्वच्छ पाणी राहावे यासाठी महापालिकेने आजवर प्रयत्न केले आहेत; परंतु भाविकांची वाढती संख्या आणि दैनंदिन होणारे विधी लक्षात घेता रामकुंडात निर्माल्यासह पाण्याच्या शुद्धतेला बाधा पोहोचत असते. रामकुंडात कायमस्वरूपी शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाने आता सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यासंदर्भात निविदाही मागविण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात गोदावरीला दरवर्षी सरासरी किमान तीन ते चार पूर येतात. अशावेळी रामकुंडातील पाणीही दूषित होते. ज्यावेळी गंगापूर धरणातून सिंचनासाठी पाण्याची आवर्तने असतात त्यावेळी गोदावरी प्रवाहित असते. त्यामुळे उन्हाळा आणि हिवाळ्यात रामकुंडातील पाणी कसे शुद्ध राखता येईल यावर काम करण्यासाठी महापालिकेने थेट सल्लागारांकडूनच सल्ला मागविण्याचे ठरविले आहे. सदर सल्लागाराकडून त्यानुसार सविस्तर प्राकलन तयार करून घेतले जाणार असून, त्यासाठी लाखो रुपयांची फी मोजली जाणार आहे.विचारपूर्वक कृतीची गरजसल्लागारांकडून मिळणाºया सल्ल्यांचे आजवर महापालिकेने नेमके काय केले आहे, याबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. स्मार्ट सिटीचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेला कोट्यवधी रुपये मोजण्यात आले; परंतु सदर आराखडा किती फसवा आणि अव्यवहार्य आहे, याची प्रचिती खुद्द स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांना आलेली आहे. शहर वाहतूक आराखडाही तयार करण्यात आला; परंतु त्यातील सूचनाही व्यवहार्य नसल्याची चर्चा होत असते. त्यामुळे सल्लागार नेमताना विचारपूर्वक कृतीची गरज असल्याचा सूर सदस्यांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी