शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

दिल्ली-मुंबई कॉरिडोरमध्ये नाशिकचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:45 AM

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनने केली आहे.

नाशिक : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, तसेच अभ्यास न करता पहिल्या टप्प्यात डीएमआयसीला अहवाल पाठविणाºया जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनने केली आहे.  यासंदर्भात विभागीय उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर योजना म्हणजे देशभरातील महामार्गाभोवती इंडस्ट्रीयल कॉरिडोअर उभे करणे. नाशिक जिल्हा हा मुंबई-पुणे-नाशिक अशा सुवर्ण त्रिकोणात असतानाही दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर योजनेतून नाशिकला वगळण्यात आले आहे. सर्वाधिक धरणाचा जिल्हा अशी ख्याती नाशिकची आहे. परंतु मुबलक पाणी नाही या कारणाने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या पहिल्या टप्प्यातून नाशिकला वगळण्यात आले. औरंगाबादला पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी धरणात नाशिकमधून पाणी जाते असे असतानासुद्धा नाशिकला मुबलक पाणी नाही, असा अहवाल अभ्यास न करताच जलसंपदा विभागाने दिल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमधून नाशिकला बाजू करून यात औरंगाबादचा समावेश करण्यात आला. दुसºया टप्प्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकला संधी उपलब्ध आहे. याकरिता जलसंपदा विभागाकडून अभ्यास न करताच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरला अहवाल पाठविण्यात येऊ नये व नाशिकचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये समावेश करण्यात यावा याकरिता प्रयत्न करावे तसेच अभ्यास न करता अहवाल पाठविणाºया जलसंपदा अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय, शहराध्यक्ष गणेश पवार, सोनू नागरे, प्रवीण साळुंके, स्वप्नील सोनवणे, अनिकेत कपोते, प्रशांत पाटील, बबन जाधव, मंगेश भदरगे, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.पाणी नाही, मग : जायकवाडीला का सोडता?दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकचा समावेश झाला तर नाशिकमध्ये मोठी औद्योगिक गुंतवणूक होऊन येथील कामगारांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. नाशिकच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत असताना जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. तेथील औद्योगिकीकरणासाठी नाशिकचे पाणी देता येत असेल तर मुबलक पाण्याचा विचार करता दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकचा समावेश करण्यात यावा, असेही म्हटले आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक