शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एनएचबीच्या किचकट अटी-शर्ती शिथिल करण्याबाबत अनुकूलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:53 IST

शेतीत आधुनिकीकरण आणण्यासाठीच्या विविध योजनांना अनुदान देताना राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या (एनएचबी) किचकट अटी-शर्तींमुळे महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या अनुदानाचे व पूर्वसंमती प्रमाणपत्राचे प्रस्ताव नाकारले आहेत. या अटी-शर्ती रद्द करून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्यासंदर्भात खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी केंद्रीय कृषी सचिव व एनएचबी अधिकाºयांच्याही भेटी घेण्यात आल्या असता किचकट अटी-शर्ती रद्द करून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे व जुने प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाºयांनी दिले.

ठळक मुद्देकृषी सचिवांचे आश्वासन : भारती पवार यांनी केली चर्चा

नाशिक : शेतीत आधुनिकीकरण आणण्यासाठीच्या विविध योजनांना अनुदान देताना राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या (एनएचबी) किचकट अटी-शर्तींमुळे महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या अनुदानाचे व पूर्वसंमती प्रमाणपत्राचे प्रस्ताव नाकारले आहेत. या अटी-शर्ती रद्द करून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्यासंदर्भात खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी केंद्रीय कृषी सचिव व एनएचबी अधिकाºयांच्याही भेटी घेण्यात आल्या असता किचकट अटी-शर्ती रद्द करून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे व जुने प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाºयांनी दिले.एनएचबीतर्फे शेतीसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एनएचबीतर्फेसंयुक्त तपासणीनंतर अनुदान कर्जखात्यात जमा केले जाते, मात्र गेल्या दीड वर्षापासून पूर्वसंमती देणे वा अनुदानाचा प्रस्ताव मंजुरीचे काम राज्यातील कार्यालयांऐवजी दिल्लीतून होऊ लागले आहे. त्यातच किचकट अटींमुळे दिल्लीतून पूर्वसंमती मिळण्यास उशीर होणे किंवा नाकारल्याचे उशिरा कळविणे, अनुदानाचे प्रस्ताव वेगवेगळ्या कारणांमुळे नाकारणे, तसेच रोपवाटिकांसाठीचे अनुदान व पूर्वसंमतीचे प्रस्ताव रद्द करणे आदी प्रकार होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. २०१७-२०२० या तीन वर्षांमध्ये अनुदानाचे ३६१ प्रस्ताव, तर पूर्वसंमतीसाठी दिलेले ५०४ प्रस्ताव किरकोळ कारणे देत नाकारण्यात आले. यामुळे या योजनेपासून महाराष्ट्रातील व विशेषत: नाशिक जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांना याचा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भारती पवार यांच्यासह प्रवीण पवार, कृषी उद्योग व कर सल्लागार सुरेश देवरे, महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनचे सचिव हेमंत कापसे, विकास नलावडे, शेतकरी कमलाकर बागुल, समीर गरूड, रु पेश शिरोडे यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीतील कृषी भवनात केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, फळबागा एकात्मिक विकास अभियानचे सहसचिव राजवीर सिंग, एनएचबीचे कार्यकारी संचालक डी. श्रीवास्तव व उपव्यवस्थापकीय संचालक ब्रिजेंदर सिंग यांची भेट घेत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.प्रशिक्षणाची अट रद्दलाभार्थी शेतकºयाला प्रस्ताव सादर करताना प्रशिक्षण घेणे अनिवार्य केल्याची अट अधिकाºयांनी तत्काळ रद्द केली. एनएचबीच्या योजनांसाठी पूर्वसंमती दाखला देणे व अनुदान वाटपाच्या किचकट अटींची माहिती भारती पवार यांनी दिल्यानंतर कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी संबंधित अधिकाºयांना कागदोपत्री आणि प्रत्यक्ष कामकाजामध्ये येणाºया अडचणी लक्षात घेऊन त्यानुसारच मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्याची सूचना केली. तसेच अग्रवाल यांनी नाशिकसह राज्यातील प्रकल्पांची स्वत: पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीministerमंत्री