शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अशोकस्तंभावर दुचाकीस्वारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:54 AM

स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, हे मात्र आश्चर्यकारकच आहे.

नाशिक : स्मार्ट रोडमुळे नागरिकांना होणारा त्रास तर टळत नाहीच, परंतु वाहतूक पोलिसांकडून या भागात दुुचाकी उभी केली की टोइंग करणारे वाहन उचलून घेते. मात्र याच ठिकाणी अस्ताव्यस्त स्वरूपात असलेल्या रिक्षाचालकांवर आणि अन्य मोठ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, हे मात्र आश्चर्यकारकच आहे.शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमी कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानचे हाती घेतलेले काम वर्र्ष-दीड वर्षापासून सुरूच आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या भागात दुकाने आणि शाळा आहेच, परंतु त्याचबरोबर हे रहिवासी क्षेत्रदेखील आहे, परंतु या नागरिकांना काय अडचणी येऊ शकतात हेदेखील समजून नियोजन केलेले नाही. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हा रस्ता घोळात आहे. परंतु त्यावर शहरातील नेते आणि राजकीय पक्ष आवाज उठवत नाहीत. या भागातील रस्त्यावरील दुकानात जायचे असेल तर लोकांना दुचाकी कोठे उभ्या करायच्या असा प्रश्न निर्माण होतो. येथील एखाद्या दुकानात जाण्यासाठी दोन मिनिटे गाडी उभी केली की टोइंग करणारी गाडी येते आणि गाडी घेऊन जाते. संबंधितांना विनंती करून दंड भरण्याची तयारी दर्शविली तरी गाडी सोडली जात नाही. इतकी वाहतूक शिस्त दाखवली जाते आणि दुसरीकडे मात्र याच ठिकाणी रिक्षा आणि अन्य मोठी प्रवासी वाहने अस्ताव्यस्त उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळाही होत असतो. परंतु त्यांच्यावर मात्र कोणीही कारवाई करीत नाही. मुळात हा त्रास दूर करण्यासाठी एक तर रस्ता कसा पूर्ण होईल यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. परंतु अनेक महापालिका आयुक्त येऊन गेले तरी रस्ता कधी पूर्ण होईल हे कोणीच सांगू शकत नाही, हा विचित्र प्रकार आहे.किमान परिस्थितीचा तरी विचार करावावर्ष-दीड वर्षापासून स्मार्ट रोडचा विषय गाजत आहे, परंतु हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना कुठेही वाहने उभी करावी लागतात. किमान त्याचा विचार करून तरी वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी किंवा नाही याचा विचार करावा.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस