शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

२०११च्या जनगणनेनुसारच योजनांचा लाभ देणार

By admin | Updated: August 23, 2016 00:31 IST

दादा भुसे : बैठकीत पेसाची अपूर्ण कामे, डासमुक्त गाव अभियान, ई-लर्निंगवर चर्चा

नाशिक : राज्य सरकारकडील सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी आता सन २०११ च्या जनगणनेनुसारच लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.नाशिक जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सोमवारी (दि.२२) दुपारी रावसाहेब थोरात सभागृहात दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयेजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे, आमदार अनिल कदम, आ.दीपिका चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार राजाभाऊ वाजे, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, उषा बच्छाव, शोभा डोखळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, विभागीय उपआयुक्त सुखदेव बनकर, अश्विन मित्रगोत्री यांच्यासह सर्व विभागांचे खातेप्रमुख व पंचायत समिती सभापती तसेच निवडक जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. स्वच्छता अभियानाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी माहिती दिली. यावर्षी २०८ गावे संपूर्ण निर्मलग्राम करण्याचे उद्दिष्ट असताना ४५ गावे आतापर्यंत शंभर टक्के हागणदारीमुक्त झाली आहेत. यावर्षी ७३,३३३ शौचालये बांधण्याचे तसेच ४०० गावे शंभर टक्केहागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आमदार नरहरी झिरवाळ व आमदार अनिल कदम यांनी वैयक्तिक शौचालयाचे पैसे अद्याप लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. त्यासाठी कमिशनची मागणी केली जाते, असा आरोप केला. पूर्णत्वाचा दाखला बाकी असल्यानेच कामे अपूर्ण दिसत असल्याचे अनिल लांडगे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी नांदेडसह मराठवाड्यात डासमुक्त गाव ही संकल्पना चांगली रूजत असल्याने संपूर्ण राज्यभर ही डासमुक्त गावाची संकल्पना आपण राबविण्यार असून, त्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना एकेक गाव दत्तक घेण्याचे सूचित करण्यात येईल, असे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तसेच बैठकीस मार्गदर्शन करताना सांगितले की, यापुढे २०११ चीच जनगणना व २०११ची दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या सर्व योजनांसाठी ग्राह्ण धरली जाणार आहे. यापुढे २००७ची जनगणना व २००७ ची दारिद्र्य रेषेखालील यादी ग्राह्ण धरली जाणार नसल्याचे दादा भुसे यांनी सांंगितले. तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल स्कूल व ई-लर्निंग प्रक्रिया राबवून खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तोडीस तोड शाळा बनवून जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा व गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)