शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

वृक्षांमुळे नव्हे मनपाच्या गलथानपणाने अपघात - भट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:48 IST

नाशिकमध्ये प्रदूषण वाढत असल्याची नोंद शासकीय स्तरावर घेतली जात असताना दुसरीकडे मात्र झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. झाडे तोडणे हा प्रत्येक ठिकाणी उपाय नाही, असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या अश्विनी भट यांनी व्यक्त केले. महामार्ग रूंदीकरणातील झाडे तोडण्यास विरोध करून त्यांनी संघर्ष केला होता. आताही त्या न्यायालयीन लढा लढत आहेत. सध्या अपघातांना कारणीभूत झाडे तोडण्यावरून सुरू असलेला वाद लक्षात घेता, त्यावर आक्षेप घेणाऱ्या पर्यावरणप्रेमींची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी अश्विनी भट यांच्याशी साधलेला संवाद...

अपघाताला कारणीभूत ठरणारी झाडे तोडण्यास विरोध का?नाशिक शहरात गंगापूररोड आणि नाशिकरोडसारख्या काही भागांत यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळात झाडे रस्त्यात आता आली आहेत आणि ती वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रस्त्यात झाड आल्याने अपघात का होतात, याचे मूळ कारण शोधले पाहिजे. रस्त्यात येणाºया झाडांवर रात्री चकाकणाºया फ्लोरोसंट कलरने पेंट केले पाहिजे. तर ते नागरिकांच्या लक्षात येते. परंतु तसे होत नाही. मनपाने झाडांवर रिफ्लेक्टर आणि टायर खिळे ठोकले आहेत. त्याचा अपघात टाळण्यासाठी उपयोग तर होत नाहीच उलट खिळे ठोकल्याने झाडांचे आयुष्य कमी होत आहेत. त्यामुळे झाडांवर आदळून मृत्यू पावण्याच्या घटनेस झाडे दोषी नसून मनपाचा गलथानपणा कारणीभूत आहे.माणसांपेक्षा झाडे महत्त्वाची आहेत काय?रस्त्यात सध्या असलेली काही प्रजातीची झाडे ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे आहेत. न्यायालयाने असे आदेश का दिलेत ते समजावून घेतले पाहिजे. महापालिका झाडे हटविते, मात्र कायद्याने बंधनकारक असतानाही रस्त्याच्या कडेला झाडे लावत नाही. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहे. माणसांचा जीव महत्त्वाचा आहे. ज्यांच्या घरात मृत्यू होतो त्यांच्याबरोबर माझ्यासह नाशिक कृती समिती सहवेदना आहेत. परंतु झाडांमुळेअपघात होतात हा गैरसमज दूर केला पाहिजे. झाडांमुळे होणाºया अपघातांपेक्षा भरधाव वेगानेधावणाºया वाहनाने पादचाऱ्यांना उडवल्याने अशा अपघातात बळी पडणाºयांची संख्या अधिक आहे.याचा विचार केला तर झाडांमुळेच अपघात होतात असे म्हणण्याततथ्य नाही.प्रत्येक झाडाला जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. परंतु झाडांना बोलता येत नाही म्हणून सर्रास झाडांना दोष दिला जातो. ५० वर्षांच्या एका देशी झाडाची शास्त्रीय किंमत साडेतीन कोटी आहे. त्याचे पर्यावरणीय महत्त्व वेगळेच. मनपा ब्लॉक प्लॅँटेशन करते हे चांगलेच, परंतु वृक्षतोड करताना त्याच वृक्षाचे पुनर्राेपणही करावे.झाडे तोडण्यात स्वारस्य, पण..शहरासाठी झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु तसे घडत नाही. लावलेली झाडे तोडण्यात मनपा तत्परता दाखविते मात्र कायद्यानुसार रस्त्याच्या कडेला दर दहामीटर अंतरावर दहा फूट उंचीची झाडे लावणे बंधनकारक आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्याचे रूंदीकरणासाठी झाडे तोडल जातात, परंतु रूंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या खासगी मिळकती ताब्यात घेतल्या जात नाही. झाडे तोडून रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यापेक्षा झाडे ठेवून पार्किंग केली तर वाहने सावलीत राहतील.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका