शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
5
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
6
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
7
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
8
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
9
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
10
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
11
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
12
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
13
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
14
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
15
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
16
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
17
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
18
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
19
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
20
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी

वृक्षांमुळे नव्हे मनपाच्या गलथानपणाने अपघात - भट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:48 IST

नाशिकमध्ये प्रदूषण वाढत असल्याची नोंद शासकीय स्तरावर घेतली जात असताना दुसरीकडे मात्र झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. झाडे तोडणे हा प्रत्येक ठिकाणी उपाय नाही, असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या अश्विनी भट यांनी व्यक्त केले. महामार्ग रूंदीकरणातील झाडे तोडण्यास विरोध करून त्यांनी संघर्ष केला होता. आताही त्या न्यायालयीन लढा लढत आहेत. सध्या अपघातांना कारणीभूत झाडे तोडण्यावरून सुरू असलेला वाद लक्षात घेता, त्यावर आक्षेप घेणाऱ्या पर्यावरणप्रेमींची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी अश्विनी भट यांच्याशी साधलेला संवाद...

अपघाताला कारणीभूत ठरणारी झाडे तोडण्यास विरोध का?नाशिक शहरात गंगापूररोड आणि नाशिकरोडसारख्या काही भागांत यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळात झाडे रस्त्यात आता आली आहेत आणि ती वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रस्त्यात झाड आल्याने अपघात का होतात, याचे मूळ कारण शोधले पाहिजे. रस्त्यात येणाºया झाडांवर रात्री चकाकणाºया फ्लोरोसंट कलरने पेंट केले पाहिजे. तर ते नागरिकांच्या लक्षात येते. परंतु तसे होत नाही. मनपाने झाडांवर रिफ्लेक्टर आणि टायर खिळे ठोकले आहेत. त्याचा अपघात टाळण्यासाठी उपयोग तर होत नाहीच उलट खिळे ठोकल्याने झाडांचे आयुष्य कमी होत आहेत. त्यामुळे झाडांवर आदळून मृत्यू पावण्याच्या घटनेस झाडे दोषी नसून मनपाचा गलथानपणा कारणीभूत आहे.माणसांपेक्षा झाडे महत्त्वाची आहेत काय?रस्त्यात सध्या असलेली काही प्रजातीची झाडे ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे आहेत. न्यायालयाने असे आदेश का दिलेत ते समजावून घेतले पाहिजे. महापालिका झाडे हटविते, मात्र कायद्याने बंधनकारक असतानाही रस्त्याच्या कडेला झाडे लावत नाही. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहे. माणसांचा जीव महत्त्वाचा आहे. ज्यांच्या घरात मृत्यू होतो त्यांच्याबरोबर माझ्यासह नाशिक कृती समिती सहवेदना आहेत. परंतु झाडांमुळेअपघात होतात हा गैरसमज दूर केला पाहिजे. झाडांमुळे होणाºया अपघातांपेक्षा भरधाव वेगानेधावणाºया वाहनाने पादचाऱ्यांना उडवल्याने अशा अपघातात बळी पडणाºयांची संख्या अधिक आहे.याचा विचार केला तर झाडांमुळेच अपघात होतात असे म्हणण्याततथ्य नाही.प्रत्येक झाडाला जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. परंतु झाडांना बोलता येत नाही म्हणून सर्रास झाडांना दोष दिला जातो. ५० वर्षांच्या एका देशी झाडाची शास्त्रीय किंमत साडेतीन कोटी आहे. त्याचे पर्यावरणीय महत्त्व वेगळेच. मनपा ब्लॉक प्लॅँटेशन करते हे चांगलेच, परंतु वृक्षतोड करताना त्याच वृक्षाचे पुनर्राेपणही करावे.झाडे तोडण्यात स्वारस्य, पण..शहरासाठी झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु तसे घडत नाही. लावलेली झाडे तोडण्यात मनपा तत्परता दाखविते मात्र कायद्यानुसार रस्त्याच्या कडेला दर दहामीटर अंतरावर दहा फूट उंचीची झाडे लावणे बंधनकारक आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्याचे रूंदीकरणासाठी झाडे तोडल जातात, परंतु रूंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या खासगी मिळकती ताब्यात घेतल्या जात नाही. झाडे तोडून रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यापेक्षा झाडे ठेवून पार्किंग केली तर वाहने सावलीत राहतील.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका