शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

ओझरला सुमारे तीनशे हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:51 IST

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.

ठळक मुद्देसदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.ओझर परिसरात शेती मोठ्या प्रमाणात असून एकूण ७३५ हेक्टर द्राक्ष लागवडीपैकी जवळपास २२५ हेक्टर द्राक्ष शेतीचे नुकसान झाले असून ७२ हेक्टर वर सोयाबीन,मका,भुईमूग व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पाऊस उघडल्यावर केला जाणारा खर्च दिवसेंदिवस महागात पडत असून असाच अवकाळी पाऊस आणखीन काही दिवस पडला तर जगणे मुश्किल होऊन जाणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे असून आधीच मंदीच्या संकटात असणाºया व्यापाऱ्यांनी याचा आतापासून धसका घेतला असल्याचे बोलले जात आहे.यंदाचा द्राक्ष हंगाम देखील तेजीत राहणार असल्याचे चित्र असले तरी मनासारखा माल न भेटलेच याची शाश्वती नसल्याने निर्यातदारांचे देखील कसब पणाला लागणार आहे. दरवर्षी प्रत्येक निर्यातदारांची बाहेर देशात ठरलेली बाजारपेठ असते. जागतिक बाजारात इतर देशांच्या वाढत्या आव्हानांना आतापर्यंत गुणवत्तेच्या आधारावर तोडीस तोड कलर व्हरायटी उपलब्ध होत असताना त्यासाठी दरवेळी सारखी अर्ली छाटणी देखील केली गेली होती, परंतु फ्लॉविरंग स्टेज मध्ये पावसाने दगा दिला आणि सगळे होत्याचे नव्हते झाले आहे.यंदा भारताच्या तुलनेत बाकी द्राक्ष उत्पादक देशांनी जर कलर व्हरायटीचा पुरवठा केला गेला तर तो पुढील हंगामात देखील पुन्हा मार्केट सेट करण्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे उत्पादकांनी देखील कोणत्याही परिस्थितीत बाग वाचलीच पाहिजे असा चंग बांधला असून पाऊस जोरदार पडल्यावर देखील बागेत साचणाºया पाण्यात उभे राहून औषध फवारणी केली जात आहे.चौकट : ओझर क्षेत्रात तलाठी उल्हास देशमुख,सर्कल अधिकारी प्रशांत तांबे यांनी पंचनामे सुरू केले असून आतापर्यंत बाणगंगानगर क्षेत्र पूर्ण झाले आहे. इतर ठिकाणच्या भागाचेही पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होतील असे देशमुख यांनी सांगितले आहे.प्रतिक्रि या....यंदाच्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ डोळ्यासमोर नुकसान ग्रस्त होत असताना सारख्या पडत असलेल्या पावसामुळे नेमके उत्पादन किती होईल याची शास्वती आता देणे कठीण आहे. गुणवत्ता आणि दर्जा टिकवताना देखील मोठी कसरत करावी लागणार असून निर्यातदारांच्या दृष्टीने यंदाचे वर्ष आव्हानाचे ठरू शकते.तुषार शिंदे, ओझर. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस