शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

ओझरला सुमारे तीनशे हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:51 IST

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.

ठळक मुद्देसदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.ओझर परिसरात शेती मोठ्या प्रमाणात असून एकूण ७३५ हेक्टर द्राक्ष लागवडीपैकी जवळपास २२५ हेक्टर द्राक्ष शेतीचे नुकसान झाले असून ७२ हेक्टर वर सोयाबीन,मका,भुईमूग व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पाऊस उघडल्यावर केला जाणारा खर्च दिवसेंदिवस महागात पडत असून असाच अवकाळी पाऊस आणखीन काही दिवस पडला तर जगणे मुश्किल होऊन जाणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे असून आधीच मंदीच्या संकटात असणाºया व्यापाऱ्यांनी याचा आतापासून धसका घेतला असल्याचे बोलले जात आहे.यंदाचा द्राक्ष हंगाम देखील तेजीत राहणार असल्याचे चित्र असले तरी मनासारखा माल न भेटलेच याची शाश्वती नसल्याने निर्यातदारांचे देखील कसब पणाला लागणार आहे. दरवर्षी प्रत्येक निर्यातदारांची बाहेर देशात ठरलेली बाजारपेठ असते. जागतिक बाजारात इतर देशांच्या वाढत्या आव्हानांना आतापर्यंत गुणवत्तेच्या आधारावर तोडीस तोड कलर व्हरायटी उपलब्ध होत असताना त्यासाठी दरवेळी सारखी अर्ली छाटणी देखील केली गेली होती, परंतु फ्लॉविरंग स्टेज मध्ये पावसाने दगा दिला आणि सगळे होत्याचे नव्हते झाले आहे.यंदा भारताच्या तुलनेत बाकी द्राक्ष उत्पादक देशांनी जर कलर व्हरायटीचा पुरवठा केला गेला तर तो पुढील हंगामात देखील पुन्हा मार्केट सेट करण्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे उत्पादकांनी देखील कोणत्याही परिस्थितीत बाग वाचलीच पाहिजे असा चंग बांधला असून पाऊस जोरदार पडल्यावर देखील बागेत साचणाºया पाण्यात उभे राहून औषध फवारणी केली जात आहे.चौकट : ओझर क्षेत्रात तलाठी उल्हास देशमुख,सर्कल अधिकारी प्रशांत तांबे यांनी पंचनामे सुरू केले असून आतापर्यंत बाणगंगानगर क्षेत्र पूर्ण झाले आहे. इतर ठिकाणच्या भागाचेही पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होतील असे देशमुख यांनी सांगितले आहे.प्रतिक्रि या....यंदाच्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ डोळ्यासमोर नुकसान ग्रस्त होत असताना सारख्या पडत असलेल्या पावसामुळे नेमके उत्पादन किती होईल याची शास्वती आता देणे कठीण आहे. गुणवत्ता आणि दर्जा टिकवताना देखील मोठी कसरत करावी लागणार असून निर्यातदारांच्या दृष्टीने यंदाचे वर्ष आव्हानाचे ठरू शकते.तुषार शिंदे, ओझर. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस