शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला सुमारे तीनशे हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:51 IST

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.

ठळक मुद्देसदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.ओझर परिसरात शेती मोठ्या प्रमाणात असून एकूण ७३५ हेक्टर द्राक्ष लागवडीपैकी जवळपास २२५ हेक्टर द्राक्ष शेतीचे नुकसान झाले असून ७२ हेक्टर वर सोयाबीन,मका,भुईमूग व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पाऊस उघडल्यावर केला जाणारा खर्च दिवसेंदिवस महागात पडत असून असाच अवकाळी पाऊस आणखीन काही दिवस पडला तर जगणे मुश्किल होऊन जाणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे असून आधीच मंदीच्या संकटात असणाºया व्यापाऱ्यांनी याचा आतापासून धसका घेतला असल्याचे बोलले जात आहे.यंदाचा द्राक्ष हंगाम देखील तेजीत राहणार असल्याचे चित्र असले तरी मनासारखा माल न भेटलेच याची शाश्वती नसल्याने निर्यातदारांचे देखील कसब पणाला लागणार आहे. दरवर्षी प्रत्येक निर्यातदारांची बाहेर देशात ठरलेली बाजारपेठ असते. जागतिक बाजारात इतर देशांच्या वाढत्या आव्हानांना आतापर्यंत गुणवत्तेच्या आधारावर तोडीस तोड कलर व्हरायटी उपलब्ध होत असताना त्यासाठी दरवेळी सारखी अर्ली छाटणी देखील केली गेली होती, परंतु फ्लॉविरंग स्टेज मध्ये पावसाने दगा दिला आणि सगळे होत्याचे नव्हते झाले आहे.यंदा भारताच्या तुलनेत बाकी द्राक्ष उत्पादक देशांनी जर कलर व्हरायटीचा पुरवठा केला गेला तर तो पुढील हंगामात देखील पुन्हा मार्केट सेट करण्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे उत्पादकांनी देखील कोणत्याही परिस्थितीत बाग वाचलीच पाहिजे असा चंग बांधला असून पाऊस जोरदार पडल्यावर देखील बागेत साचणाºया पाण्यात उभे राहून औषध फवारणी केली जात आहे.चौकट : ओझर क्षेत्रात तलाठी उल्हास देशमुख,सर्कल अधिकारी प्रशांत तांबे यांनी पंचनामे सुरू केले असून आतापर्यंत बाणगंगानगर क्षेत्र पूर्ण झाले आहे. इतर ठिकाणच्या भागाचेही पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होतील असे देशमुख यांनी सांगितले आहे.प्रतिक्रि या....यंदाच्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ डोळ्यासमोर नुकसान ग्रस्त होत असताना सारख्या पडत असलेल्या पावसामुळे नेमके उत्पादन किती होईल याची शास्वती आता देणे कठीण आहे. गुणवत्ता आणि दर्जा टिकवताना देखील मोठी कसरत करावी लागणार असून निर्यातदारांच्या दृष्टीने यंदाचे वर्ष आव्हानाचे ठरू शकते.तुषार शिंदे, ओझर. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस