शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

९५ वे साहित्य संमेलन उदगीरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 01:46 IST

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे घेण्यात येणार असल्याची असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली. पुढील चार महिन्यांच्या आत हे संमेलन घेण्यात येणार असल्याचे ९४ व्या साहित्य संमेलन समारोपप्रसंगी ठाले-पाटील यांनी सांगितले. या संमेलनाच्या माध्यमातून नाशिकरांसोबत नाते जोडले गेले आहे. पुढील चार-पाच वर्षांनी आमंत्रण द्या, पुन्हा नाशिकला येऊ, असेदेखील ठाले-पाटील यांनी या वेळी सांगितले.

ठळक मुद्देसाहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले-पाटील यांची घोषणा

नाशिक : ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे घेण्यात येणार असल्याची असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली. पुढील चार महिन्यांच्या आत हे संमेलन घेण्यात येणार असल्याचे ९४ व्या साहित्य संमेलन समारोपप्रसंगी ठाले-पाटील यांनी सांगितले. या संमेलनाच्या माध्यमातून नाशिकरांसोबत नाते जोडले गेले आहे. पुढील चार-पाच वर्षांनी आमंत्रण द्या, पुन्हा नाशिकला येऊ, असेदेखील ठाले-पाटील यांनी या वेळी सांगितले.

कुसुमाग्रज नगरीत सुरू असलेल्या ९४ व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे सूप रविवारी वाजले. या वेळी समारोप सत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.

ठाले-पाटील म्हणाले, नाशिकच्या संमेलनाला अबालवृद्धांचे हातभार लागले. अध्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी संमेलन सुरळीत पार पडल्याचा टोळा देखील त्यांनी लगावला. संमेलनात करण्यात आलेल्या ठरावांचा साहित्य महामंडळ नक्कीच पाठपुरावा करेल. ठराव बासनात बांधून ठेवले जाणार नाहीत. हे ठराव संबधित विभागाला पाठवून त्यांचा नियमित पाठपुरावा केला जाईल. मात्र, मराठी संबधित मुद्दा आला की बऱ्याचदा अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे, यासाठी लोकप्रतिनिधींच्या मदतीची गरज असते. व्यासपीठावर उपस्थित मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावी. त्यांनी लक्ष न दिल्यास विधान परिषदेच्या उपाध्यक्षांनी सरकारला आदेश द्यावा असेल देखील ठाले-पाटील यांनी सांगितले. ठराव ही भावना साहित्यिकांची, लोकांची आहे, त्यामुळे ठरावातील मराठी भाषिकांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवावे, असेही आवाहन त्यांनी केले. तसेच शेतकऱ्याच्या प्रश्नांवर पोटतिडकीने विचार करण्याची मागणी केली. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी संमेलनात स्वत:हून सहभाग घेतला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे देखील ठाले-पाटील म्हणाले. निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले.

----------

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेवर ठाले-पाटील म्हणाले, समाजातील सर्वजण सहिष्णू असतात असे नाही. त्यामुळे अशा काही घटनांकडे दुर्लक्ष करायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे व्यवहारकोश तयार केला, तोच उपक्रम यशवंतराव चव्हाण यांनीही राबवला. त्याचा आता किती उपयोग होतो हे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही ठाले पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकKautikrao Thale Patilकौतिकराव ठाले-पाटील