शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नाशिक अपघातातील 8 मृतांची ओळख पटली, तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

By संजय पाठक | Updated: October 9, 2022 09:58 IST

नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी ही माहिती दिली. 

संजय पाठक

नाशिक - यवतमाळ येथून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईला निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या विनावातानुकूलित स्लीपर लक्झरी बसला नाशिक शहरातील तपोवनाजवळ शनिवारी पहाटे पाच वाजता भीषण अपघात झाला. शहरातील औरंगाबाद मार्गावर झालेल्या या बस अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यातील आठ जणांची ओळख पटली असून तीन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी ही माहिती दिली. 

वाशीम मधील उद्धव भिलंग, वैभव भिलंग, साहिल चंद्रशेखर, अशोक बनसोड, ब्राम्हदत्त मनवर हे पाच जण, बुलडाणा येथील कल्याणी मुधोळकर, पार्वती मुधोळकर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शंकर कुचनकर यांची ओळख पटली आहे. काल पहाटे नाशिक शहरातील औरंगाबाद मार्गावर यवतमाळ- मुंबई या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसची आयशर ट्रकशी धडक झाली आणि त्यानंतर बसला आग लागली होती. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 43 प्रवासी जखमी झाले होते.

मृतांच्या नातेवाइकांना ७ लाख 

मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये तर गंभीर जखमींना दाेन लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये जखमींना भेट दिल्यानंतर केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमींना पूर्ण उपचार केले जातील, कोणतीही काळजी करू नका, असे सांगत दिलासा दिला. केंद्राकडूनही मृतांच्या कुटुंबीयांना दाेन लाख तर गंभीर जखमींना ५० हजारांची मदत दिली जाणार आहे. 

बसची धडक बसल्यानंतर ट्रकचा डिझेल टँक फुटला. त्यानंतर भीषण आग लागली. घटनेची माहिती पोलीस, अग्निशमन दलाला तब्बल अर्ध्या तासाने मिळाली. शहराच्या अगदी जवळ झालेल्या या अपघातावेळी आपत्कालीन मदत उशिराने पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातfireआग