शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शहरातून ६१६ श्रमिक विशेष रेल्वेने बिहारला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 21:42 IST

रविवारी (दि ३१)दुपारी ४ वाजता विशेष रेल्वेने ६१६ व्यक्तींना बिहार मध्ये पाठवण्यात आले.रेल्वे स्थानकावर या नागरिकांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती.

ठळक मुद्देमनपाचा पुढाकार; वैद्यकीय तपासणी नंतर पाठवणी

नाशिक :  महानगरपालिकेच्या वतीने बिहारच्या विविध भागातील राहणाऱया ६१६ श्रमिकांना रविवारी (दि 31) दुपारी विशेष श्रमिक रेल्वेने त्यांच्या मूळ गावी विशेष रेल्वेने पाठवण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या अशा प्रकारे एकूण १० हजार ८६९ परराज्यातील नागरिकांना रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले.

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली होती. रविवारी (दि ३१)दुपारी ४ वाजता विशेष रेल्वेने ६१६ व्यक्तींना बिहार मध्ये पाठवण्यात आले.रेल्वे स्थानकावर या नागरिकांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी या सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.तसेच यासर्व प्रवाश्यांचे रेल्वे तिकीट बुकिंग प्रशासनामार्फत करण्यात आले.तसेच रेल्वे स्थानकात व रेल्वे प्रवासात फिजिकल डिस्टन्स राहील या बाबत दक्षता घेण्यात आली. या सर्व नागरिकांना पाठवण्यापूर्वी मनपाचे वैद्यकीय पथकाने त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले. तसेच त्यांना प्रवासात दोन दिवस पुरेल एवढे पाणी बॉटल, सुके खाद्यपदार्थ, दशम्या सोबत देण्याची व्यवस्था उपायुक्त अर्चना तांबे यांनी याबाबत नियोजन केले व मनपा शिक्षण समितीचे अधिकारी ,कर्मचारी यांची यावेळी उपस्थित होते.

नाशिक शहरातून मध्य प्रदेश, छत्तीसगड ,हिमाचल प्रदेश,तमिळनाडू ,मिझोराम, उत्तर प्रदेश, बिहार या सारख्या विविध राज्यांमध्ये १० हजार ८६९ इतक्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी रेल्वेद्वारे पाठवण्याची व्यवस्था नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. या सर्व नागरिकांना कुठलीही अडचण होणार नाही याबाबत मनपाच्या वतीने विशेष दखल घेण्यात आली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वे