शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
5
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
6
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
7
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
8
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
9
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
10
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
11
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
13
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
14
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
15
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
17
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
18
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
19
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
20
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण हक्कापासून ५० टक्के विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:59 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.आरटीई प्रवेशप्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेऊन प्रत्यक्ष पात्रताधारकांऐवजी तांत्रिकदृष्टा प्रवेशप्रक्रियेचे निकष पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिले जात असल्याने अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत असून, किमान येणाºया शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रियेत तरी सुधारणा होण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मागास व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागा राखीव आहेत. मात्र किचकट प्रवेशप्रक्रिया आणि कायद्यातील पळवाटांचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांमुळे जिल्हाभरातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत, तर चालू शैक्षणिक वर्षातही १३०० विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळू शकलेला नाही.तब्बल चार महिने प्रवेशप्रक्रिया चालूनही १,२९९ विद्यार्थ्यांना जागा रिक्त राहिल्या आहेत. जागा रिक्त असूनही प्रवेश मिळणार नसतील तर शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आगामी शैक्षणिक वर्षात राखीव जागांवर प्रवेश मिळवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.प्रवेशप्रक्रियेवर प्रश्नचिन्हजिल्ह्यातील आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाºया १४ हजार ५७३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७ हजार २७१ विद्यार्थ्यांचीच प्रवेशासाठी निवड झाली होती. उर्वरित ७ हजार ३०२ विद्यार्थ्यांना चार फेºयांमध्ये प्रवेशाची संधी मिळालेली नाही. अशा िस्थितीत तब्बल १३०० जागा रिक्त राहिल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे, तर आगामी वर्षात आपल्यांना आरटीईअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश मिळवून देऊ इच्छिणाºया पालकांकडून आरक्षित जागा रिक्त असूनही मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने आरटीई प्रवेशप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.आरटीई अंतर्गत वर्षनिहाय प्रवेशशैक्षणिक वर्ष शाळांची संध्या उपलब्ध जागा प्रत्यक्ष प्रवेश२०१२-१३ २३८ ३७७९ ५०६२०१३-१४ २९२ ४६७३ ९४९२०१४-१५ ३३७ ५५३३ १३३०२०१५-१६ ३६७ ५८२७ २१५९२०१६-१७ ३७२ ५९०० २१५७२०१७-१८ ४५८ ६४३३ ३६४६

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक