शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

शिक्षण हक्कापासून ५० टक्के विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:59 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.आरटीई प्रवेशप्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेऊन प्रत्यक्ष पात्रताधारकांऐवजी तांत्रिकदृष्टा प्रवेशप्रक्रियेचे निकष पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिले जात असल्याने अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत असून, किमान येणाºया शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रियेत तरी सुधारणा होण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मागास व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागा राखीव आहेत. मात्र किचकट प्रवेशप्रक्रिया आणि कायद्यातील पळवाटांचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांमुळे जिल्हाभरातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत, तर चालू शैक्षणिक वर्षातही १३०० विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळू शकलेला नाही.तब्बल चार महिने प्रवेशप्रक्रिया चालूनही १,२९९ विद्यार्थ्यांना जागा रिक्त राहिल्या आहेत. जागा रिक्त असूनही प्रवेश मिळणार नसतील तर शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आगामी शैक्षणिक वर्षात राखीव जागांवर प्रवेश मिळवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.प्रवेशप्रक्रियेवर प्रश्नचिन्हजिल्ह्यातील आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाºया १४ हजार ५७३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७ हजार २७१ विद्यार्थ्यांचीच प्रवेशासाठी निवड झाली होती. उर्वरित ७ हजार ३०२ विद्यार्थ्यांना चार फेºयांमध्ये प्रवेशाची संधी मिळालेली नाही. अशा िस्थितीत तब्बल १३०० जागा रिक्त राहिल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे, तर आगामी वर्षात आपल्यांना आरटीईअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश मिळवून देऊ इच्छिणाºया पालकांकडून आरक्षित जागा रिक्त असूनही मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने आरटीई प्रवेशप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.आरटीई अंतर्गत वर्षनिहाय प्रवेशशैक्षणिक वर्ष शाळांची संध्या उपलब्ध जागा प्रत्यक्ष प्रवेश२०१२-१३ २३८ ३७७९ ५०६२०१३-१४ २९२ ४६७३ ९४९२०१४-१५ ३३७ ५५३३ १३३०२०१५-१६ ३६७ ५८२७ २१५९२०१६-१७ ३७२ ५९०० २१५७२०१७-१८ ४५८ ६४३३ ३६४६

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक