शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

शिक्षण हक्कापासून ५० टक्के विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:59 IST

शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर नाशिक जिल्ह्यात २०१२-१३ पासून २०१७-१९ पर्यंत एकदाही उपलब्ध जागेच्या ५० टक्के प्रवेश होऊन शकलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित असून, चालू शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू झाल्यानंतर सुमारे जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया चालवून चार प्रवेशफेऱ्या घेऊनही जिल्हाभरातील सुमारे १३०० विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.आरटीई प्रवेशप्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेऊन प्रत्यक्ष पात्रताधारकांऐवजी तांत्रिकदृष्टा प्रवेशप्रक्रियेचे निकष पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिले जात असल्याने अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत असून, किमान येणाºया शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रियेत तरी सुधारणा होण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत मागास व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागा राखीव आहेत. मात्र किचकट प्रवेशप्रक्रिया आणि कायद्यातील पळवाटांचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांमुळे जिल्हाभरातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत, तर चालू शैक्षणिक वर्षातही १३०० विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळू शकलेला नाही.तब्बल चार महिने प्रवेशप्रक्रिया चालूनही १,२९९ विद्यार्थ्यांना जागा रिक्त राहिल्या आहेत. जागा रिक्त असूनही प्रवेश मिळणार नसतील तर शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आगामी शैक्षणिक वर्षात राखीव जागांवर प्रवेश मिळवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.प्रवेशप्रक्रियेवर प्रश्नचिन्हजिल्ह्यातील आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाºया १४ हजार ५७३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७ हजार २७१ विद्यार्थ्यांचीच प्रवेशासाठी निवड झाली होती. उर्वरित ७ हजार ३०२ विद्यार्थ्यांना चार फेºयांमध्ये प्रवेशाची संधी मिळालेली नाही. अशा िस्थितीत तब्बल १३०० जागा रिक्त राहिल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे, तर आगामी वर्षात आपल्यांना आरटीईअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश मिळवून देऊ इच्छिणाºया पालकांकडून आरक्षित जागा रिक्त असूनही मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने आरटीई प्रवेशप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.आरटीई अंतर्गत वर्षनिहाय प्रवेशशैक्षणिक वर्ष शाळांची संध्या उपलब्ध जागा प्रत्यक्ष प्रवेश२०१२-१३ २३८ ३७७९ ५०६२०१३-१४ २९२ ४६७३ ९४९२०१४-१५ ३३७ ५५३३ १३३०२०१५-१६ ३६७ ५८२७ २१५९२०१६-१७ ३७२ ५९०० २१५७२०१७-१८ ४५८ ६४३३ ३६४६

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक