शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 18:54 IST

यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्याने जिल्ह्यात ८३ टक्केच पाऊस नोंदविला गेला, त्यातही ठराविक वेळेत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणाची क्षमता पाहून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धरणे भरू शकली नाहीत.

ठळक मुद्देउन्हाची तीव्रता : गंगापूर समूहात ६८ टक्के पाणीजिल्ह्यात आजच सुमारे साडेतीनशे गावे, वाड्यांना पाणीटंचाई

नाशिक : जिल्ह्यात थंडीची लाट ओसरून उन्हाची तीव्रता वाढू लागताच, धरणातील जलसाठ्यांमध्ये कमालीची पातळी खालावली असून, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जेमतेम ४५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. यंदा उन्हाळा कडक असणार असल्याचा हवामान खात्याने यापूर्वीच अंदाज वर्तविल्याने शिल्लक असलेला जलसाठा तब्बल सहा महिने पुरविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आजच सुमारे साडेतीनशे गावे, वाड्यांना पाणीटंचाई भेडसावू लागल्याने १११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्याने जिल्ह्यात ८३ टक्केच पाऊस नोंदविला गेला, त्यातही ठराविक वेळेत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणाची क्षमता पाहून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धरणे भरू शकली नाहीत. आॅक्टोबर अखेर ७३ टक्केच पाणी धरणांमध्ये साठले, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ३७ टक्के कमी होते. पाऊस कमी झाल्याने साहजिकच आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी वाढत असून, सद्यस्थितीत ३५० गावे, वाड्यांना १११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जानेवारीत थंडीचा कडाका वाढल्यामुळे पाण्याच्या वापराला काही प्रमाणात अटकाव बसला असला तरी, धरणांमध्ये सिंचनासाठी ठेवलेले आवर्तन सोडावे लागले, त्याचबरोबर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला. जानेवारीच्या तिसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम ४५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ५९ टक्के तर समूहात ६८ टक्के पाणी आहे. पालखेड व दारणा धरणात अनुक्रमे ३४ व ४१ टक्के जलसाठा असून, चणकापूरमध्ये ७८ तर हरणबारीत ५७ टक्के पाणी आहे. जळगाव जिल्हा व मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा धरणात ३१ टक्केच पाणी शिल्लक आहे.आगामी काळात उन्हाचा तडाखा वाढणार असून, त्याप्रमाणात धरणातील पाण्याचे बाष्पीभवन व गळतीचे प्रमाण वाढेल, त्याचबरोबर पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याबरोबरच, त्याची चोरी रोखण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्याचे पाणी जुलैअखेर पुरेल, असा प्रशासनाचा दावा आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक