शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

४२ खेडी पाणीपुरवठा योजना अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 1:50 AM

गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देग्रामपंचायतींना निधी उपलब्ध वीज वितरण कंपनीने दाखविली संवेदनशीलता

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. या प्रकरणी वीज वितरण कंपनीनेदेखील संवेदनशीलता दाखविल्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरळीत होण्यास मदत झाली.जिल्हा परिषदेने जिल्हा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीमधून १३ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच वीज वितरण कंपनीकडून याकामी पुढाकार घेण्यात आल्याने ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत नांदगाव व चांदवड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिलाची रक्कम वारंवार थकीत राहत असल्याने ही योजना बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून थकीत बिलामुळे या योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ४० गावांत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ही योजना तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही याबाबत चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनीदेखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला योजना सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तत्काळ बैठक आयोजित केली होती. यामध्ये वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पाणीपुरवठा योजनेशी संबंधित सर्व यंत्रणांना बोलाविण्यात आले होते. डॉ. गिते यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चालू वीजबिल तसेच मागील थकीत बिलाही रक्कम कमी करून ११ लाख ८० हजार देयक भरून वीज जोडण्याची सूचना वीज वितरण विभागास केली होती. वीज वितरण विभागानेही सकारात्मक भूमिका घेतल्याने शुक्रवारपासून ही योजना पूर्ववत सुरू झाली आहे. नाग्यासाक्या धरणातून सदरचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पाणीपुरवठा विभागाला सूचना४२ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडील देखभाल दुरु स्तीमधून वीज देयक भरण्यासाठी साडेसात लाख, तर देखभाल दुरु स्तीसाठी साडेपाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, वीज वितरण विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयाने ही योजना सुरू करण्यात यश आले आहे. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात अशाप्रकारे थकीत वीजबिलामुळे कोणतीही योजना बंद पडणार नाही यासाठी पाणीपुरवठा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी