नाशिक : दारणा नदीच्या काठालगत असलेल्या सामनगाव, एकलहरे परिसरात बिबट्याचा संचार अद्यापही कायम आहे. या भागात एक दोन नव्हे तर तब्बल २० पिंजऱ्यांची तटबंदी करण्यात आली आहे. बिबट्या रात्रीच्यावेळी भटकंती करतो अन् पिंजºयांभोवती फेरफटकाही मारतो; मात्र पिंज-यात येत नसल्याने वनविभागापुढे सध्या प्रतीक्षा व प्रयोगांमध्ये अदलाबदल करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लढविल्या जाणा-या क्लृप्त्याही पावसाच्या रिपरिपीमुळे अयशस्वी ठरू लागल्या आहेत.
३८ ट्रॅप कॅमेरे अन् २० पिंजरे मात्र रिपरिपीमुळे प्रयोगांवर पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:38 IST
संध्याकाळनंतर रहिवाशांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, वनविभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत बिबट्यांच्या हल्ल्यांत होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,
३८ ट्रॅप कॅमेरे अन् २० पिंजरे मात्र रिपरिपीमुळे प्रयोगांवर पाणी!
ठळक मुद्देबिबट्याचा संचार कायमपावसामुळे अडचणींत वाढ गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी