शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

३८ ट्रॅप कॅमेरे अन् २० पिंजरे मात्र रिपरिपीमुळे प्रयोगांवर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:38 IST

संध्याकाळनंतर रहिवाशांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, वनविभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत बिबट्यांच्या हल्ल्यांत होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,

ठळक मुद्देबिबट्याचा संचार कायमपावसामुळे अडचणींत वाढ गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी

नाशिक : दारणा नदीच्या काठालगत असलेल्या सामनगाव, एकलहरे परिसरात बिबट्याचा संचार अद्यापही कायम आहे. या भागात एक दोन नव्हे तर तब्बल २० पिंजऱ्यांची तटबंदी करण्यात आली आहे. बिबट्या रात्रीच्यावेळी भटकंती करतो अन् पिंजºयांभोवती फेरफटकाही मारतो; मात्र पिंज-यात येत नसल्याने वनविभागापुढे सध्या प्रतीक्षा व प्रयोगांमध्ये अदलाबदल करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लढविल्या जाणा-या क्लृप्त्याही पावसाच्या रिपरिपीमुळे अयशस्वी ठरू लागल्या आहेत.

दारणाकाठालगत बिबट्याच्या हल्ल्यात चार बळी गेले आहेत. यामध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. तसेच चौघा चिमुकल्यांचे प्राण सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यात बचावला आहे. दारणाकाठालगतच्या विविध गावांमध्ये ऊसशेतीलगत सुमारे ३८ ट्रॅप कॅमेरे व २० पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. तरीदेखील बिबट्या अद्याप जेरबंद होऊ शकलेला नाही.दारणा खोºयालगत बाभळेश्वर, हिंगणवेढे, दोनवाडे या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहेत. तसेच चेहडी, पळसे, सामनगाव, कोटमगाव या गावांत दैव बलवत्तर राहिल्यामुळे मुलांचे प्राण वाचले. या गावांमध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन अन् हल्ले झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युध्दपातळीवर मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. दरम्यान, दारणा खो-यालगत गावांमध्ये संध्याकाळनंतर रहिवाशांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, वनविभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत बिबट्यांच्या हल्ल्यांत होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागRainपाऊस