शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

८४ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 01:26 IST

मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.

नाशिक : मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.२ अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या महापुरामुळे नुकसानीत अधिकच भर पडली असून, अजूनही मोठ्या परिसरातील शेतीक्षेत्रावर पाणी साचल्याने पंचनामेदेखील रडखले आहेत.यंदा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्टÑापुढे मोठा प्रसंग उभा राहिला होता. त्यातच जूनमध्ये मान्सूनने वारंवार हुलकावणी दिल्यामुळे विभागातल अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषणता वाढतच गेली. अनेक तालुक्यांमधून तर कृत्रिम पावसाचीदेखील मागणी पुढे येऊ लागली होती. जुलैच्या दुसºया आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे संपूर्ण चित्र बदलून गेले आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचे नुकसान झाले. यामध्ये शेतपिकांचे नुकसान अधिक असून, अद्यापही अनेक भागातील शेतीमध्ये पाणी साचले आहे. (पान ५ वर)त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्टÑातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्णात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जून ते आॅगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्णातील २२,३३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्णात ८,१८५, नंदुरबारमध्ये १२,१५९, जळगावमध्ये १३,७४१ तर अहमदनगर येथील आठ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून २७,४११ हेक्टर असे एकूण ८३,८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम नाशिक जिल्ह्णावर झाला असून नदीकाठावरील जनजीवन अद्यापही पूर्ववत होऊ शकलेले नाही.अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑातील लाभार्थी आणि बाधित गावांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असून, येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. नाशिक जिल्ह्णातील ३२ हजार ६४९, धुळे जिल्ह्णात ९,२२८, नंदुरबारमध्ये २०,२३७, जळगावमधील १०,३४४ आणि नगरमधील ४७,५९२ याप्रमाणे एक लाख २० हजार बाधित लाभार्थी असून १७१५ गावांमधील नागरिकांना पुराचा फटका बसलेला आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आलेला आहे...या पिकांचे झाले नुकसानसोयाबीन, कांदा, मका, बाजरी, लिंबू, डाळिंब, केळी, आंबा आणि पडवळ ही पिके अतिवृष्टीत बाधित झालेली आहेत. विभागात ७७ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले असून ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची संख्या ५,८४७ हेक्टर इतकी आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे.

टॅग्स :floodपूरagricultureशेतीFarmerशेतकरी