शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

८४ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 01:26 IST

मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.

नाशिक : मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.२ अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या महापुरामुळे नुकसानीत अधिकच भर पडली असून, अजूनही मोठ्या परिसरातील शेतीक्षेत्रावर पाणी साचल्याने पंचनामेदेखील रडखले आहेत.यंदा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्टÑापुढे मोठा प्रसंग उभा राहिला होता. त्यातच जूनमध्ये मान्सूनने वारंवार हुलकावणी दिल्यामुळे विभागातल अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषणता वाढतच गेली. अनेक तालुक्यांमधून तर कृत्रिम पावसाचीदेखील मागणी पुढे येऊ लागली होती. जुलैच्या दुसºया आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे संपूर्ण चित्र बदलून गेले आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचे नुकसान झाले. यामध्ये शेतपिकांचे नुकसान अधिक असून, अद्यापही अनेक भागातील शेतीमध्ये पाणी साचले आहे. (पान ५ वर)त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्टÑातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्णात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जून ते आॅगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्णातील २२,३३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्णात ८,१८५, नंदुरबारमध्ये १२,१५९, जळगावमध्ये १३,७४१ तर अहमदनगर येथील आठ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून २७,४११ हेक्टर असे एकूण ८३,८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम नाशिक जिल्ह्णावर झाला असून नदीकाठावरील जनजीवन अद्यापही पूर्ववत होऊ शकलेले नाही.अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑातील लाभार्थी आणि बाधित गावांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असून, येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. नाशिक जिल्ह्णातील ३२ हजार ६४९, धुळे जिल्ह्णात ९,२२८, नंदुरबारमध्ये २०,२३७, जळगावमधील १०,३४४ आणि नगरमधील ४७,५९२ याप्रमाणे एक लाख २० हजार बाधित लाभार्थी असून १७१५ गावांमधील नागरिकांना पुराचा फटका बसलेला आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आलेला आहे...या पिकांचे झाले नुकसानसोयाबीन, कांदा, मका, बाजरी, लिंबू, डाळिंब, केळी, आंबा आणि पडवळ ही पिके अतिवृष्टीत बाधित झालेली आहेत. विभागात ७७ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले असून ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची संख्या ५,८४७ हेक्टर इतकी आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे.

टॅग्स :floodपूरagricultureशेतीFarmerशेतकरी