शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

८४ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 01:26 IST

मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.

नाशिक : मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. या अतिवृष्टीचा फटका उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजारापेक्षा अधिक गावांना बसला तर ८४ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले.२ अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या महापुरामुळे नुकसानीत अधिकच भर पडली असून, अजूनही मोठ्या परिसरातील शेतीक्षेत्रावर पाणी साचल्याने पंचनामेदेखील रडखले आहेत.यंदा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्टÑापुढे मोठा प्रसंग उभा राहिला होता. त्यातच जूनमध्ये मान्सूनने वारंवार हुलकावणी दिल्यामुळे विभागातल अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषणता वाढतच गेली. अनेक तालुक्यांमधून तर कृत्रिम पावसाचीदेखील मागणी पुढे येऊ लागली होती. जुलैच्या दुसºया आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे संपूर्ण चित्र बदलून गेले आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचे नुकसान झाले. यामध्ये शेतपिकांचे नुकसान अधिक असून, अद्यापही अनेक भागातील शेतीमध्ये पाणी साचले आहे. (पान ५ वर)त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्टÑातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्णात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जून ते आॅगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्णातील २२,३३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्णात ८,१८५, नंदुरबारमध्ये १२,१५९, जळगावमध्ये १३,७४१ तर अहमदनगर येथील आठ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून २७,४११ हेक्टर असे एकूण ८३,८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम नाशिक जिल्ह्णावर झाला असून नदीकाठावरील जनजीवन अद्यापही पूर्ववत होऊ शकलेले नाही.अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑातील लाभार्थी आणि बाधित गावांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात असून, येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. नाशिक जिल्ह्णातील ३२ हजार ६४९, धुळे जिल्ह्णात ९,२२८, नंदुरबारमध्ये २०,२३७, जळगावमधील १०,३४४ आणि नगरमधील ४७,५९२ याप्रमाणे एक लाख २० हजार बाधित लाभार्थी असून १७१५ गावांमधील नागरिकांना पुराचा फटका बसलेला आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आलेला आहे...या पिकांचे झाले नुकसानसोयाबीन, कांदा, मका, बाजरी, लिंबू, डाळिंब, केळी, आंबा आणि पडवळ ही पिके अतिवृष्टीत बाधित झालेली आहेत. विभागात ७७ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले असून ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची संख्या ५,८४७ हेक्टर इतकी आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी नुकतीच नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे.

टॅग्स :floodपूरagricultureशेतीFarmerशेतकरी