शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कांदा अनुदानासाठी २७० कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 02:03 IST

मातीमोल भावाने कांदाविक्री करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने शासनाने जाहीर केलेल्या अनुदानासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २७० कोटी रुपयांची गरज असून, सहकार विभागाने आजवर एक लाख ८१ हजार शेतकºयांची माहिती शासन दरबारी अपलोड केली, असून, अजून जवळपास एक लाख शेतकºयांच्या माहितीची छाननी सुरू असल्याने त्यानंतरच प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

नाशिक : मातीमोल भावाने कांदाविक्री करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने शासनाने जाहीर केलेल्या अनुदानासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २७० कोटी रुपयांची गरज असून, सहकार विभागाने आजवर एक लाख ८१ हजार शेतकºयांची माहिती शासन दरबारी अपलोड केली, असून, अजून जवळपास एक लाख शेतकºयांच्या माहितीची छाननी सुरू असल्याने त्यानंतरच प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.नाशिक जिल्ह्यात रांगडा कांद्याचे बाजारात आगमन होताच, साधारणत: आॅक्टोबर महिन्यात उन्हाळ कांद्याचे भाव कोसळले. अडीच ते तीन हजार क्विंटल दराने जाणारा कांदा दिवसेंदिवस घसरल्याने अखेर तो ४०० ते ५०० रुपयांपर्यंत म्हणजेच ५० पैसे किलोने शेतकºयांना विकावा लागला. कांद्याचे भाव कोसळण्यास सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करीत जिल्ह्णात गावोगावी शेतकºयांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या निषेधार्थ आंदोलने केली. अनेक ठिकाणी कांदा रस्त्यावर ओतून रोष प्रगट केला. तर काही शेतकºयांनी कांदा विक्रीतून आलेले पैसे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावर मनिआॅर्डर करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर शासनाने कांदा विक्रीवर क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान जाहीर केले. दोनशे क्विंटलपर्यंत प्रत्येक शेतकºयाला दोनशे रुपये अनुदान देण्याचे, परंतु त्यासाठी शेतकºयांनी कांदा विक्रीच्या पावत्या सादर करण्याची अट घातली. प्रारंभी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती. परंतु शेतकºयांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केल्याने शासनाने ३१ मार्चपर्यंत शेतकºयांना मागणी नोंदविण्याची मुदत दिली.प्रथमदर्शनी पात्र शेतकºयांच्या संख्येचा विचार करता, जिल्ह्णासाठी २७० कोटी रुपयांची गरज आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून शेतकºयांना सदर रकमेचे वाटप केले जाण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने सहकार विभागाला या संदर्भात लवकर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.पाच हजार शेतकºयांची नावे दुबारजिल्ह्यात दोन लाख ८० हजारांहून अधिक शेतकºयांनी आपली मागणी नोंदविली असून, सहकार खात्याने या मागणीची पडताळणी करून एक लाख ८० हजार शेतकºयांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली. त्यात पाच हजार शेतकºयांची नावे दुबार आढळून आली आहेत. उर्वरित एक लाख शेतकºयांची माहितीची तपासणी केली जात असून, त्यांची माहिती शासनाला सादर केल्यानंतर अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला जाईल.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी