शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

कांदा अनुदानासाठी २७० कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 02:03 IST

मातीमोल भावाने कांदाविक्री करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने शासनाने जाहीर केलेल्या अनुदानासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २७० कोटी रुपयांची गरज असून, सहकार विभागाने आजवर एक लाख ८१ हजार शेतकºयांची माहिती शासन दरबारी अपलोड केली, असून, अजून जवळपास एक लाख शेतकºयांच्या माहितीची छाननी सुरू असल्याने त्यानंतरच प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

नाशिक : मातीमोल भावाने कांदाविक्री करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने शासनाने जाहीर केलेल्या अनुदानासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २७० कोटी रुपयांची गरज असून, सहकार विभागाने आजवर एक लाख ८१ हजार शेतकºयांची माहिती शासन दरबारी अपलोड केली, असून, अजून जवळपास एक लाख शेतकºयांच्या माहितीची छाननी सुरू असल्याने त्यानंतरच प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.नाशिक जिल्ह्यात रांगडा कांद्याचे बाजारात आगमन होताच, साधारणत: आॅक्टोबर महिन्यात उन्हाळ कांद्याचे भाव कोसळले. अडीच ते तीन हजार क्विंटल दराने जाणारा कांदा दिवसेंदिवस घसरल्याने अखेर तो ४०० ते ५०० रुपयांपर्यंत म्हणजेच ५० पैसे किलोने शेतकºयांना विकावा लागला. कांद्याचे भाव कोसळण्यास सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करीत जिल्ह्णात गावोगावी शेतकºयांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या निषेधार्थ आंदोलने केली. अनेक ठिकाणी कांदा रस्त्यावर ओतून रोष प्रगट केला. तर काही शेतकºयांनी कांदा विक्रीतून आलेले पैसे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावर मनिआॅर्डर करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर शासनाने कांदा विक्रीवर क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान जाहीर केले. दोनशे क्विंटलपर्यंत प्रत्येक शेतकºयाला दोनशे रुपये अनुदान देण्याचे, परंतु त्यासाठी शेतकºयांनी कांदा विक्रीच्या पावत्या सादर करण्याची अट घातली. प्रारंभी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती. परंतु शेतकºयांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केल्याने शासनाने ३१ मार्चपर्यंत शेतकºयांना मागणी नोंदविण्याची मुदत दिली.प्रथमदर्शनी पात्र शेतकºयांच्या संख्येचा विचार करता, जिल्ह्णासाठी २७० कोटी रुपयांची गरज आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून शेतकºयांना सदर रकमेचे वाटप केले जाण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने सहकार विभागाला या संदर्भात लवकर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.पाच हजार शेतकºयांची नावे दुबारजिल्ह्यात दोन लाख ८० हजारांहून अधिक शेतकºयांनी आपली मागणी नोंदविली असून, सहकार खात्याने या मागणीची पडताळणी करून एक लाख ८० हजार शेतकºयांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली. त्यात पाच हजार शेतकºयांची नावे दुबार आढळून आली आहेत. उर्वरित एक लाख शेतकºयांची माहितीची तपासणी केली जात असून, त्यांची माहिती शासनाला सादर केल्यानंतर अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला जाईल.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी