शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

राजीव गांधी योजनेचा २३२ रुग्णांनी घेतला लाभ

By admin | Updated: August 22, 2015 23:53 IST

जिल्हा रुग्णालय : शासनाकडून संबंधित कंपनीस ३६ लाख रुपयांचे देयक

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात गत २० महिन्यांच्या कालावधीत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून २९६ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, या उपचारापोटी ३० लाख २७ हजार ६७७ रुपये संबंधित कंपनीस अदा केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी दिली़सरकारच्या राजीव गांधी आरोग्यदायी योजनेद्वारे तब्बल ९७२ आजारांवर उपचार केले जातात़ विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ रेशन कार्डामध्ये नाव असणे गरजेचे असते़ गंभीर आजारावर दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार, तर किडनीचा आजार असेल तर अडीच लाख रुपयांपर्यंतचा उपचार या योजनेद्वारे मोफत केला जातो़ जिल्ह्यातील ३० रुग्णालयांमध्ये या योजनेद्वारे उपचार केले जात असून जिल्हा रुग्णालयातही उपचार केले जातात़या योजनेचा केशरी, अंत्योदय, पिवळे तसेच अन्नपूर्णा कार्ड असलेल्या कुटुंबाला लाभ घेता येतो़ जिल्हा रुग्णालयात गत वीस महिन्यांच्या कालावधीत या योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून, यासाठी रेशनकार्डवर नाव असणे गरजेचे आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी आपल्यासोबत रेशनकार्ड घेऊन येणे गरजेचे आहे़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेतला जात असल्याचेही डॉ़ एकनाथ माले म्हणाले़ (प्रतिनिधी)