शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर धरणात 22 टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:34 IST

नांदरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नद्या वाहत्या झाल्या आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानाकडे तसेच भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत 80 दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी: गतवर्षी आँगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरले होते धरण

नांदरशिंगोटे : सिन्नर तालुक्यासह नांदूरशिंगोटे परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, अनेक बंधारे व पाझर तलाव भरले आहेत. नद्या वाहत्या झाल्या आहेत. मात्र, म्हाळुंगी नदीच्या उगमस्थानाकडे तसेच भोजापूरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी प्रमाणात आहे. भोजापूर धरणात शनिवारी सकाळपर्यंत 80 दशलक्ष घनफूट म्हणजे बावीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.तालुक्यासह परिसरातील गांवामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासूनच दमदार पाऊस पडल्याने बळीराजा समाधानी आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वच भागात पाऊस पडत आहे. मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मागील आठवड्यात पावसाचा जोर ओसरला होता. परंतु पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेती शिवार हिरवेगार झाले आहे. तसेच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असले तरीभोजापूर धरणाच्या पाणी साठ्यावरच लाभक्षेत्रातील शेतीचे गणित अवलंबूनअसते. परंतु. पाणलोट क्षेत्रात पाऊस नझाल्याने धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी भोजापूर धरण दोन आँगस्टला पूर्ण भरले होते. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र धरणातील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेतवाढला नाही. गतवर्षी भोजापूर धरणात 27 जुलै पासून पाण्याची आवक सुरु झाली होती. गेल्यावर्षी दोनच दिवसात धरणात 45 टक्के पाण्याची आवक झाली होती. तसेच दोन महिन्याच्या आसपास धरणातून पूरपाणी सुरु होते. भोजापूरच्या धरणाच्या पाण्यावर कणकोरी व मनेगाव नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. यावर्षी खरीप हंगामातच पावसाने जोरदार सलामी दिल्याने बळीराजा सुखावला आहे. 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण