शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२००९ मध्ये मनसेवरच होता ईव्हीएम हॅकचा आरोप

By संजय पाठक | Updated: July 14, 2019 02:03 IST

देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून मनसेचे तीन आमदार अनपेक्षितरीत्या निवडून आल्यानंतर त्यावेळी नाशिकमध्येच मनसेने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप १९ पराभूत उमेदवारांनी केला होता.

ठळक मुद्देनाशिकमधील विधानसभा ; १९ विरोधकांनी केला होता आरोप

नाशिक : देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधूनमनसेचे तीन आमदार अनपेक्षितरीत्या निवडून आल्यानंतर त्यावेळी नाशिकमध्येच मनसेने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप १९ पराभूत उमेदवारांनी केला होता. कॉँग्रेसच्या माजी राज्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयापर्यंत नेलेले हे प्रकरण मागे पडले, परंतु अनपेक्षित निकालामुळे अशाप्रकारचे तर्कट त्यावेळी कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या विरोधकांनी केले होते. अर्थात, त्यावेळी अनपेक्षितरीत्या निवडून आले होते मनसे आमदार आणि आता भाजपचे खासदार इतकाच काय तो फरक!लोकसभा निवडणुकीत भाजपला पाशवी बहुमत मिळाल्यानंतर ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला त्यात राज ठाकरेदेखील सहभागी झाले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात एकत्रित लढा देण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे; मात्र मनसे नवा पक्ष असताना त्यांच्यावर सर्वप्रथम असे आरोप करण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे प्रथमच विधानसभा निवडणूक लढविताना १३ आमदार निवडून आले होते. नाशिक शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत मनसेचे आमदार निवडून आले. यात नाशिक पूर्वमधून (कै.) अ‍ॅड. उत्तमराव ढिकले, पश्चिममधून नितीन भोसले तर नाशिक मध्यमधून वसंत गिते हे स्वतंत्र लढलेले कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना-भाजप या पक्षांच्या प्रस्थापित नेत्यांना पराभूत करून निवडून आले होते. त्यावेळी कॉँग्रेस, राष्टÑवादीबरोबरच अन्य विरोधकदेखील हबकले होते. मनसेच्या विजयाच्या मागील कारणे शोधताना मग मनसेने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी १९ पराभूत उमेदवार एकत्र आले. त्यानंतर ईव्हीएम हॅक होत असल्याच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.कॉँग्रेसच्या माजी राज्यमंत्री आणि पराभूत उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी तर थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र नंतर खटला अर्धवट सोडून दिला. विशेष म्हणजे त्यावेळी बच्छाव यांनी बंगळुरूमधून एक अभियंता शोधून आणला आणि त्या अभियंत्याने मुंबईत ईव्हीएम हॅकचे प्रात्यक्षिक केले होते; परंतु ते त्यांच्या आणि बच्छाव यांच्या अंगलट आलेच, शिवाय फौजदारी कारवाईपर्यंत ते पोहोचले होते.कॉँग्रेसची सत्ता असल्यानेच मागे पडले प्रकरणकॉँग्रेसच्या माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी ईव्हीएम हॅक होत असल्याची तक्रार उच्च न्यायालयात केली होती. म्हणजेच हॅकिंगचा सर्वप्रथम लढा नाशिकमधूनच सुरू झाला होता; परंतु त्यावेळी देशात आणि राज्यात कॉँग्रेस आघाडीची सत्ता होती. (कै.) विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. सरकारला प्रतिवादी केल्यानंतर त्यांच्या विरोधातही लढा देण्याची वेळ आली होती. त्यासंदर्भात सरकारला भूमिका घ्यावी लागणार होती. आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत टाकायचे नसल्याने बच्छाव यांनी खटला पुढे चालविलाच नाही.ईव्हीएम हॅकिंगचा आरोप आज राज ठाकरे करीत असले तरी चमत्कारीकरीत्या नाशिकमधून तीन आमदार निवडून आल्यानंतरच प्रथम आरोप त्यांच्याच पक्षाच्या आमदारांवर करण्यात आला होता. सध्या ईव्हीएम हॅकच्या निमित्ताने नाशिकमध्ये या चर्चेला या निमित्ताने उजाळा मिळत आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणMNSमनसे