शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

२००९ मध्ये मनसेवरच होता ईव्हीएम हॅकचा आरोप

By संजय पाठक | Updated: July 14, 2019 02:03 IST

देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून मनसेचे तीन आमदार अनपेक्षितरीत्या निवडून आल्यानंतर त्यावेळी नाशिकमध्येच मनसेने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप १९ पराभूत उमेदवारांनी केला होता.

ठळक मुद्देनाशिकमधील विधानसभा ; १९ विरोधकांनी केला होता आरोप

नाशिक : देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधूनमनसेचे तीन आमदार अनपेक्षितरीत्या निवडून आल्यानंतर त्यावेळी नाशिकमध्येच मनसेने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप १९ पराभूत उमेदवारांनी केला होता. कॉँग्रेसच्या माजी राज्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयापर्यंत नेलेले हे प्रकरण मागे पडले, परंतु अनपेक्षित निकालामुळे अशाप्रकारचे तर्कट त्यावेळी कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या विरोधकांनी केले होते. अर्थात, त्यावेळी अनपेक्षितरीत्या निवडून आले होते मनसे आमदार आणि आता भाजपचे खासदार इतकाच काय तो फरक!लोकसभा निवडणुकीत भाजपला पाशवी बहुमत मिळाल्यानंतर ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला त्यात राज ठाकरेदेखील सहभागी झाले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात एकत्रित लढा देण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे; मात्र मनसे नवा पक्ष असताना त्यांच्यावर सर्वप्रथम असे आरोप करण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या करिष्म्यामुळे प्रथमच विधानसभा निवडणूक लढविताना १३ आमदार निवडून आले होते. नाशिक शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत मनसेचे आमदार निवडून आले. यात नाशिक पूर्वमधून (कै.) अ‍ॅड. उत्तमराव ढिकले, पश्चिममधून नितीन भोसले तर नाशिक मध्यमधून वसंत गिते हे स्वतंत्र लढलेले कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना-भाजप या पक्षांच्या प्रस्थापित नेत्यांना पराभूत करून निवडून आले होते. त्यावेळी कॉँग्रेस, राष्टÑवादीबरोबरच अन्य विरोधकदेखील हबकले होते. मनसेच्या विजयाच्या मागील कारणे शोधताना मग मनसेने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी १९ पराभूत उमेदवार एकत्र आले. त्यानंतर ईव्हीएम हॅक होत असल्याच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.कॉँग्रेसच्या माजी राज्यमंत्री आणि पराभूत उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी तर थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र नंतर खटला अर्धवट सोडून दिला. विशेष म्हणजे त्यावेळी बच्छाव यांनी बंगळुरूमधून एक अभियंता शोधून आणला आणि त्या अभियंत्याने मुंबईत ईव्हीएम हॅकचे प्रात्यक्षिक केले होते; परंतु ते त्यांच्या आणि बच्छाव यांच्या अंगलट आलेच, शिवाय फौजदारी कारवाईपर्यंत ते पोहोचले होते.कॉँग्रेसची सत्ता असल्यानेच मागे पडले प्रकरणकॉँग्रेसच्या माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी ईव्हीएम हॅक होत असल्याची तक्रार उच्च न्यायालयात केली होती. म्हणजेच हॅकिंगचा सर्वप्रथम लढा नाशिकमधूनच सुरू झाला होता; परंतु त्यावेळी देशात आणि राज्यात कॉँग्रेस आघाडीची सत्ता होती. (कै.) विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. सरकारला प्रतिवादी केल्यानंतर त्यांच्या विरोधातही लढा देण्याची वेळ आली होती. त्यासंदर्भात सरकारला भूमिका घ्यावी लागणार होती. आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत टाकायचे नसल्याने बच्छाव यांनी खटला पुढे चालविलाच नाही.ईव्हीएम हॅकिंगचा आरोप आज राज ठाकरे करीत असले तरी चमत्कारीकरीत्या नाशिकमधून तीन आमदार निवडून आल्यानंतरच प्रथम आरोप त्यांच्याच पक्षाच्या आमदारांवर करण्यात आला होता. सध्या ईव्हीएम हॅकच्या निमित्ताने नाशिकमध्ये या चर्चेला या निमित्ताने उजाळा मिळत आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणMNSमनसे