शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

धरणांमध्ये अवघा १९ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:02 IST

जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर पुन्हा उष्णतेच्या पाऱ्याने ३८ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली

नाशिक : जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर पुन्हा उष्णतेच्या पाऱ्याने ३८ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून, एप्रिलच्या तिसºया आठवड्यातच जिल्ह्णातील धरणांतील पाणीसाठा जेमतेम १९ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात २८ टक्के, तर समूहात २९ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्णातील ८६५ गावांना २३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा जिल्ह्णात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्णातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्णात थंडीने तग धरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी मागणी नसली तरी, मार्च उजाडताच मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष करून बागलाण, चांदवड, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा, सुरगाणा व येवला या आठ तालुक्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी होत चालला असून, उष्णतेचे प्रमाण वाढताच बाष्पीभवन व गळतीमुळे जेमतेम १९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर हेच प्रमाण ३३ टक्के इतके होते. शिवाय मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन धरणातून सोडण्यात येणार आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात २८ टक्के, तर समूहात २९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय कडवा, तिसगावमध्ये दोन तर भावली धरणात सहा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.जिल्ह्णातील पाण्याच्या मागणीचा विचार करता आठ तालुक्यांतील १९२ गावे व ६७३ वाड्या अशा ८६५ गावांमध्ये आजच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने २३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी धरणातून तर जवळपास ९३ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात टॅँकरच्या संख्येने सव्वा दोनशेचा आकडा ओलांडला आहे.तालुकानिहाय टॅँकरबागलाण- ३३, चांदवड- ११, देवळा- ९, मालेगाव- ३९, नांदगाव- ५१, सुरगाणा- ३, सिन्नर- ५१, येवला तालुक्याला ४१ टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी