शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

धरणांमध्ये अवघा १९ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 01:02 IST

जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर पुन्हा उष्णतेच्या पाऱ्याने ३८ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली

नाशिक : जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर पुन्हा उष्णतेच्या पाऱ्याने ३८ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून, एप्रिलच्या तिसºया आठवड्यातच जिल्ह्णातील धरणांतील पाणीसाठा जेमतेम १९ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात २८ टक्के, तर समूहात २९ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्णातील ८६५ गावांना २३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा जिल्ह्णात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्णातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्णात थंडीने तग धरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी मागणी नसली तरी, मार्च उजाडताच मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष करून बागलाण, चांदवड, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा, सुरगाणा व येवला या आठ तालुक्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी होत चालला असून, उष्णतेचे प्रमाण वाढताच बाष्पीभवन व गळतीमुळे जेमतेम १९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर हेच प्रमाण ३३ टक्के इतके होते. शिवाय मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन धरणातून सोडण्यात येणार आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात २८ टक्के, तर समूहात २९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय कडवा, तिसगावमध्ये दोन तर भावली धरणात सहा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.जिल्ह्णातील पाण्याच्या मागणीचा विचार करता आठ तालुक्यांतील १९२ गावे व ६७३ वाड्या अशा ८६५ गावांमध्ये आजच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने २३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी धरणातून तर जवळपास ९३ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात टॅँकरच्या संख्येने सव्वा दोनशेचा आकडा ओलांडला आहे.तालुकानिहाय टॅँकरबागलाण- ३३, चांदवड- ११, देवळा- ९, मालेगाव- ३९, नांदगाव- ५१, सुरगाणा- ३, सिन्नर- ५१, येवला तालुक्याला ४१ टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी