शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

जिल्ह्यात १६ हजार  घरे अजूनही अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:20 IST

डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्यातील सोळा हजांरापेक्षा जास्त घरांमध्ये अद्यापही वीज पोहचलेलीच नाही

नाशिक : डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्यातील सोळा हजांरापेक्षा जास्त घरांमध्ये अद्यापही वीज पोहचलेलीच नाही. असे असताना टार्गेट कमी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.  ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्यरेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे, तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे) अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीजजोडणी मिळणार आहे. जिल्ह्यात १७ हजार ८०८ घरांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे, तर १६ हजार ८६० घरांना अद्याप विजेची  प्रतीक्षा आहे. दारिद्र्यरेषेखालील आणि रेषेवरील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात विद्युतीकरण जोरात सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी नाशिक परिमंडळाच्या दप्तरी नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय विद्युतीकरणाची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.अशी आहे योजना४ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे) मोफत वीजजोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे, तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे) अवघ्या ५०० रु पयांमध्ये वीजजोडणी मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीजबिलासोबत दहा समान हप्त्यात भरावयाचे आहे. आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या देशभरातील चार कोटी ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली असून, त्यासाठी १६ हजार कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागातील घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. यातून रोजगाराच्या संधी वाढण्यासोबतच स्त्रियांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.गावे विद्युतीकरण मोजणीची अजब तहागावाचे विद्युतीकरण झाल्याबाबत अजब निष्कर्ष काढला जात आहे. ज्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळा, पाणीपुरवठा योजना यांना वीजपुरवठा करण्यात आला आहे याबरोबरच १० टक्के घरांना वीजजोडणी असेल तर ते गाव विद्युतीकरण झाल्याचे जाहीर केले जाते. दहा टक्केनुसार म्हणजे शंभर घरांचे गाव असेल आणि दहा घरांना वीज दिली तरी ते गाव विद्युतीकरण झाले असे जाहीर केले जाते. अशा प्रकारे विद्युतीकरणाची व्याख्या केली जात असून, या पद्धतीने विद्युतीकरणासाठीच मोहीम सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत जास्तीत जास्त घरांमध्ये वीज पोहचविण्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात दहापटीप्रमाणेच घरांमध्ये वीज पोहचणार आहे.

टॅग्स :electricityवीज