शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

जिल्ह्यात १६ हजार  घरे अजूनही अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:20 IST

डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्यातील सोळा हजांरापेक्षा जास्त घरांमध्ये अद्यापही वीज पोहचलेलीच नाही

नाशिक : डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर बिजली योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजना आणली आहे. नाशिक परिमंडळातदेखील या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नाशिक ग्रामीण विभागात गटनिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र जिल्ह्यातील सोळा हजांरापेक्षा जास्त घरांमध्ये अद्यापही वीज पोहचलेलीच नाही. असे असताना टार्गेट कमी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.  ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्यरेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे, तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे) अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीजजोडणी मिळणार आहे. जिल्ह्यात १७ हजार ८०८ घरांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे, तर १६ हजार ८६० घरांना अद्याप विजेची  प्रतीक्षा आहे. दारिद्र्यरेषेखालील आणि रेषेवरील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात विद्युतीकरण जोरात सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी नाशिक परिमंडळाच्या दप्तरी नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय विद्युतीकरणाची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.अशी आहे योजना४ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता सौभाग्य योजनेतून घेण्यात येणार आहे. डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत योजनेचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे) मोफत वीजजोडणीसोबतच एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे, तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे) अवघ्या ५०० रु पयांमध्ये वीजजोडणी मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीजबिलासोबत दहा समान हप्त्यात भरावयाचे आहे. आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या देशभरातील चार कोटी ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली असून, त्यासाठी १६ हजार कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागातील घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. यातून रोजगाराच्या संधी वाढण्यासोबतच स्त्रियांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.गावे विद्युतीकरण मोजणीची अजब तहागावाचे विद्युतीकरण झाल्याबाबत अजब निष्कर्ष काढला जात आहे. ज्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळा, पाणीपुरवठा योजना यांना वीजपुरवठा करण्यात आला आहे याबरोबरच १० टक्के घरांना वीजजोडणी असेल तर ते गाव विद्युतीकरण झाल्याचे जाहीर केले जाते. दहा टक्केनुसार म्हणजे शंभर घरांचे गाव असेल आणि दहा घरांना वीज दिली तरी ते गाव विद्युतीकरण झाले असे जाहीर केले जाते. अशा प्रकारे विद्युतीकरणाची व्याख्या केली जात असून, या पद्धतीने विद्युतीकरणासाठीच मोहीम सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत जास्तीत जास्त घरांमध्ये वीज पोहचविण्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात दहापटीप्रमाणेच घरांमध्ये वीज पोहचणार आहे.

टॅग्स :electricityवीज