शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१३ रुपये किलोचा मका ३० पैशांत विकण्याची वेळ! शासकीय खरेदीचा बट्ट्याबोळ

By श्याम बागुल | Updated: November 16, 2017 04:32 IST

गेल्या वर्षी आधारभूत किमतीच्या नावाने जिल्ह्यात १३ रुपये किलो दराने खरेदी केलेला सुमारे ३८ हजार क्विंटल मका रेशन दुकानदारांचे कमिशन वजा जाता आता केवळ ३० पैशांत विकण्याची वेळ सरकारवर आली आहे.

नाशिक : गेल्या वर्षी आधारभूत किमतीच्या नावाने जिल्ह्यात १३ रुपये किलो दराने खरेदी केलेला सुमारे ३८ हजार क्विंटल मका रेशन दुकानदारांचे कमिशन वजा जाता आता केवळ ३० पैशांत विकण्याची वेळ सरकारवर आली आहे. मका जबरदस्तीने रेशन ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला तरी, खाण्यासाठी ग्राहक तो घेतीलच याची शाश्वती प्रशासकीय यंत्रणेलाही नाही. विशेष म्हणजे, वर्षभर १० गोदामांमध्ये तो ठेवण्यासाठी तब्बल सहा लाख रुपये अतिरिक्त खर्च झाला आहे.गेल्या वर्षी शासनाने मक्याची १,३०० रुपये ६५ पैसे क्विंटल आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे आदेश मार्केट फेडरेशनला दिले होते. नोव्हेंबरमध्ये खरेदी केंद्रे सुरू केली होती. तेव्हा खुल्या बाजारात मक्याला १,१०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. त्यामुळे साहजिकच शेतकºयांनी सर्व शेतमाल फेडरेशनच्या केंद्रांवर आणला. दोन महिन्यांत फेडरेशनने ३८ हजार क्विंटल मक्याची खरेदी केली. जानेवारीनंतर मक्याला सरासरी १४५० रुपयांपेक्षा अधिक दर मिळाल्याने शेतकºयांनी केंद्राकडे पाठ फिरविली व त्यानंतर खरेदी केंद्रेही बंद झाली. मक्याच्या साठवणुकीची जबाबदारी तहसीलदारांकडे सोपविली होती. मात्र साठवणुकीची सोय शासनाकडे नसल्याने तहसीलदारांची गोदामांच्या शोधासाठी दमछाक उडाली. त्यासाठी महिन्याकाठी ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागले.आता वर्षभरानंतर साठवलेल्या मक्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. नवीन मका बाजारात आल्याने शासनाने जुना मका रेशनद्वारे शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.रेशनवर देणार, गव्हात कपातप्रत्येक शिधापत्रिकाधारकाला १५ किलो तांदूळ व २० किलो गहू सवलतीच्या दरात उपलब्ध होतो. मका खपविण्यासाठी शासनाने गव्हात कपात करत एक रुपया दराने तीन किलो मका ग्राहकाला देण्याच्या सूचना पुरवठा अधिकाºयांना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी डिसेंबरपासून करण्याचे घाटत आहे.आधीच्या कमिशनमध्ये आणखी ७० पैशांची भररेशनमधून ग्राहकांना एक रुपया किलो दराने मका विक्री होणार असली तरी, शासनाला त्यातून फक्त ३० पैसेच मिळणार आहेत. रेशन दुकानदाराला एक किलोमागे ७० पैसे कमिशन देण्याचे कबूल करण्यात आले आहे. त्यात पुन्हा सरकारकडून एक किलो धान्य विक्रीमागे दीड रुपया कमिशन अगोदरच दिले जाते. दुकानदारांना किलोमागे तब्बल २ रुपये २० पैसे कमिशन मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार