शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

१३ तास अन्न, पाण्याविना मुस्लीम आबालवृद्ध करताहेत ‘रोजा’; रमजान पर्वला उत्साहात प्रारंभ!

By अझहर शेख | Updated: March 12, 2024 14:45 IST

सुरूवातीचे पंधरा उपवास हे सुमारे १३ तासांचे असून त्यानंतर मात्र १४ तासांचे पुढील उपवास असणार आहे.

 नाशिक : प्रत्येक पुण्यकर्माचा सत्तरपटीने अधिक मोबदला मिळवून देणाऱ्या पवित्र रमजान पर्वला सोमवारी (दि.११) संध्याकाळी घडलेल्या चंद्रदर्शनाने प्रारंभ करण्यात आला. मंगळवारी (दि.१२) पहाटे ५वाजून २८ मिनिटांपासून मुस्लीम बांधवांनी रमजानच्या पहिल्या उपवासाला (रोजा) प्रारंभ केला. सुरूवातीचे पंधरा उपवास हे सुमारे १३ तासांचे असून त्यानंतर मात्र १४ तासांचे पुढील उपवास असणार आहे.

मुस्लीम बांधव ११महिन्यांपासून आतुरतेने रमजान पर्वची प्रतीक्षा करत होते. शाबान या अरबी महिन्याच्या २९तारखेला सोमवारी सायंकाळी स्पष्ट चंद्रदर्शन घडताच समाजबांधवांमध्ये आनंदाची लहर पसरली. इस्लामी कालगणनेतील रमजानुल मुबारक हा नववा महिना आहे. या महिन्याला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे. निर्जळी उपवासांचा महिना म्हणून रमजान ओळखला जातो. या महिन्याची तीन खंडात विभागणी करण्यात आली आहे. पहिले दहा दिवस हे कृपाखंडाचे त्यानंतर मोक्षखंडाचे दहा दिवस अन् शेवटचा खंड हा नरकापासून मुक्ती मिळविण्याचा मानला जातो. या महिन्यात समाजबांधव अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेसाठी (इबादत) देतात. यामुळे संपुर्ण दिनचर्या बदललेली पहावयास मिळते. मोहल्ले पहाटेपासूनच गजबजत असून अबालवृद्धांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तसेच संध्याकाळी बाजारपेठांमध्येही चैतन्याचे वातावरण पहावयास मिळत आहे. हंगामी ‘मिनी मार्केट’ शहरातील मुस्लीमबहुल भागात थाटू लागले आहेत.

काय आहे ‘सहेरी’ अन् ‘इफ्तार’सुर्योदयाच्या साधारणत: दोन तास अगोदर पहाटेच्या सुमारास घ्यावयाच्या अल्पोहाराच्या विधीला ‘सहेरी’ असे म्हटले जाते. ठराविक वेळेत हा विधी पार पाडावयाचा असतो. रमजानचे विशेष वेळापत्रकात नमूद वेळेप्रमाणे सहेरी व इफ्तार आटोपायचा असतो. तसेच सुर्यास्ताच्यावेळी सायंकाळी उपवास सोडण्याच्या विधीला ‘इफ्तार’ असे म्हटले जाते.

‘तरावीह’चे नमाजपठण; मशिदींमध्ये गर्दीशहर व परिसरातील मशिदींमध्ये नमाज, कुराणपठणाकरिता समाजबांधवांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे सर्वच मशिदींमध्ये बैठकव्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुबलक प्रमाणात पाणी, विद्यूत व्यवस्था अद्ययावत करण्यात आली आहे. उपासनेसाठी येणाऱ्या नागरिकांची कुठल्याहीप्रकारे गैरसोय होऊ नये, याची खबरदारी प्रत्येक मशिदींमध्ये घेतली जात आहे. रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये ‘तरावीह’चे नमाजपठण केले जात आहे. यादरम्यान, धर्मगुरूंकडून कुराणचे मुखोद्गत पठण करण्यात येते. 

टॅग्स :RamzanरमजानMuslimमुस्लीम