१०० कोटी वृक्षलागवड योजना कागदावरच
By Admin | Updated: June 29, 2014 00:48 IST2014-06-28T22:07:45+5:302014-06-29T00:48:57+5:30
१०० कोटी वृक्षलागवड योजना कागदावरच

१०० कोटी वृक्षलागवड योजना कागदावरच
शफीक शेख
मालेगाव
राज्यात पावसाने वक्रदृष्टी केल्याने शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरण्याच होऊ शकलेल्या नाहीत. त्यात राज्य शासनाच्या वनविभागातर्फे शंभर कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला असला तरी, पावसाअभावी ही वृक्षलागवड अद्याप सुरूच झालेली नाही.
गेल्या वर्षापासून प्रत्येक वनविभागास रोपवन लागवडीखाली उद्दिष्ट दिले जाते. नाशिक जिल्ह्यात मालेगाव उपवन विभागात यावर्षी ३५४ हेक्टर क्षेत्रावर रोपवन लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पाऊस आल्यावर यावर्षी चार लाख रोपांची लागवड पावसाळ्यात करण्यात येणार आहे. मालेगाव तालुक्यात वनविभागातर्फे हाताणे, गाळणे, लुल्ले, हरणबारी, जाखोड, दोधेश्वर येथे वनविभागातर्फे रोपवाटिका तयार केल्या आहेत. त्यात साडेसहा लाख रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त शंभर हेक्टर क्षेत्रावर प्रत्येक बिटात नियत क्षेत्रात ५ हेक्टर प्रमाणे ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांमार्फत बीजारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.४राज्य शासनाने १३ मे २०१४ रोजी ग्रामवन घोषित करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार बागलाण तालुक्यातील केरोबानगर गावाची ग्रामवनासाठी निवड करण्यात आली असून, ग्रामवन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
४२५ हेक्टर क्षेत्रात रोपवन लागवड करण्याकरिता साडेतीन लाख रुपये खर्च येतो. वृक्षलागवडीसाठी व संगोपनासाठी शासनास ५० लाख रुपये खर्च येतो. गत वर्षात शंभर कोटी वृक्षलागवड ४३२ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली असून, सात लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची माहिती उपविभागीय वनाधिकारी दराडे यांनी दिली.
४त्यात सुमारे ८० टक्के जिवंत रोपांची टक्केवारी आहे. शंभर कोटी वृक्षांची लागवड केल्याने पर्यावरण संतुलन राबवण्यासाठी त्याची मदत होणार असल्याने शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. एकंदरीत शासनाने वृक्षलागवडीवर लाखो रुपये खर्च करून शंभर कोटी वृृक्षलागवडीचा संकल्प केलेला असताना पावसाच्या लहरीपणामुळे ही वृक्षलागवडही अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे.