शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

राज्य शासनाने दहावीच्या निकालाची सूत्रे नुकतीच जाहीर केली आहेत. ५०, ३०, २० ही सूत्रे अभ्यासात सर्वसामान्य असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना फायदेशीर ...

राज्य शासनाने दहावीच्या निकालाची सूत्रे नुकतीच जाहीर केली आहेत. ५०, ३०, २० ही सूत्रे अभ्यासात सर्वसामान्य असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना फायदेशीर असली तरी जे विद्यार्थी अभ्यासू आहेत, त्यांना यामुळे नुकसान होणार असून अशा विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश कसा मिळू शकेल याची चिंता लागली आहे. कारण जे विद्यार्थी अभ्यासू आहेत त्यांच्या दृष्टीने दहावीची परीक्षा घेतली असती तर गुणांच्या आधारे अशा विद्यार्थ्यांना अकरावी साठी आपले आवडीचे महाविद्यालय भेटले असते. मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने दहावीची परीक्षा न घेता नववीच्या गुणांच्या आधारे तसेच अंतर्गत मूल्यमापन आधारे गुण देण्यात येणार असल्याने सर्वसामान्य तसेच हुशार विद्यार्थी दहावीच्या निकालात एकाच रांगेत दिसून येणार आहेत.

दहावीच्या निकालासाठी गृहपाठ, तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षेसाठी शाळांना पुन्हा एकदा तयारी करावी लागणार आहे. अंतर्गत लेखी मूल्यमापन अनेक शाळांचे तयार असले तरी बहुतांश शाळांचे अंतर्गत मूल्यमापन तयार असेलच असे नाही. कारण शाळा चालू झाल्या होत्या त्यावेळेस सर्व शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे शिक्षकांचा कल दिसून येत होता. शिवाय विद्यार्थ्यांच्या वही, पुस्तक यांना स्पर्श करावयाचा नसल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी कानोसा घेता आला नाही. तरी सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे. २०२० - २०२१ या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी दहावीला आहेत, त्यांपैकी जे हुशार विद्यार्थी असतील त्यांना आयुष्यभर परीक्षा विना आपण अकरावी साठी पुढे ढकलले गेल्याचे मनात सलत राहील. हुशार विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी सीईटीमध्ये संधी शोधावी लागणार आहे.

दहावी बोर्डाचे वर्ष असल्यामुळे यावर्षी खूप अभ्यास केला होता. मात्र नववीच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल सर्व विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक असला तरी दहावीची परीक्षा घेतली असती तर अकरावी प्रवेश सुलभ झाला असता.

सुहास माळी, जयनगर.

दहावीची परीक्षा ऑफलाईन झाली असती तर अभ्यासू विद्यार्थ्यांना आनंदच झाला असता, मात्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार निकाल तयार करतांना हुशार विद्यार्थी व सर्वसामान्य विद्यार्थी एकाच रँकमध्ये येणार नाहीत. याची दक्षता निकाल तयार करतांना घ्यायला हवी.

धनराज दत्तू माळी, जयनगर.