विविध संकटांवर मात केल्यानंतर या कामाला गती मिळाली आहे. सुरूवातीला ‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस’ (आयएलएफएस) ही कंपनीला चौपदरीकरण काम देण्यात आले होते आर्थिक संकटात सापडल्याने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ठप्प होते. एल अॅण्ड टी कंपनीला काम दिले होते. भूसंपादनातील दिरंगाईसह विविध अडचणींमुळे काम सुरू होण्यापूर्वीच एल अॅण्ड टी कंपनीने काम सोडून दिले. जीएसव्ही कंपनीने ६५ टक्के काम केले होते. आर्थिक कारणास्तव पुन्हा ठेकेदार बदलून मुंबई येथील जे.एम म्हात्रे रखडलेले चौपदरीकरणाचे काम कंपनीला देण्यात आले. आता कामाला चांगली गती मिळाली असली वेळेत ते पूर्ण होणे गरजेचे आहे.
कोंडाईबारी घाट कटिंगचे काम युद्धपातळीवर
नवापूर ते फागणेपर्यंत १४० किलोमीटर अंतरावरील महामार्ग चौपदरीकरण व कोंडाईबारी घाट कटिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. छोटेमोठे पुल तयार करण्याचे काम सुरू आहे. नवापूर शहरातील देवळीफळी, इस्लामपुरा भागातील एकूण ५९ घरे महामार्गात स्थलांतरित होणार आहेत.
१२२ पुलांचे बांधकाम सुरू आहेत
नवापूर ते फागणे महामार्गवरील उड्डान पुल, रेल्वे उड्डाणपूल व मुख्य महामार्गालगतचे सर्व्हिस रोड तसेच नद्या, नाले, ओढे यांच्या वरील मोऱ्यांचे रूंदीकरणचा कामाला सुरुवात झाली आहे. नवापूर तालुक्यातील वाकीपाडा, रंगावली, रायंगण, गंगापूर, विसरवाडी, पानबारा, कोंडाईबारी येथील मोठे पूल मृत्यूचा सापळे बनले होते. काम अपुर्ण आहे. तसेच लहान व मोठे असे एकूण १२२ पुल आहेत. उड्डाणपूल (पीओबी) ५ मोठे बोगदे तर ७ लहान बोगदे ( व्हीओपी). आणि ३ रेल्वे उड्डाणपूल (आर.ओ.पी) संख्या आहे. असून काम लवकर पुर्ण करण्यात येणार आहे.