शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 9:30 PM

चहावाल्याने कडक सरकार दिल्याचा दावा

नंदुरबार : मोदी सरकार आदिवासींचे आरक्षण काढून घेणार असल्याची अफवा पसरविली जात आहे. मात्र जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणावर व जमिनीवर कुणीही हात लावू शकणार नाही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी नंदुरबार येथे झालेल्या सभेत दिला.नंदुरबार व धुळ्याचे भाजपचे उमेदवार डॉ.हीना गावीत आणि डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी येथील धुळे रस्त्यावरील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या वेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, नव्या भारताच्या उभारणीसाठी भाजपने गेल्या पाच वर्षात अनेक विकास योजना राबवल्या आणि लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवल्या.काँग्रेस सरकारच्या राजवटीत कर्जमाफी दिली गेली पण ज्यांच्यासाठी ती दिली गेली त्या आदिवासींपर्यंत ती पोहोचली नाही. केवळ धनधांडग्यांसाठीच ती योजना होती. कारण आदिवासींचे बँकेत खातेच नव्हते. त्यामुळे त्यांना कर्ज मिळाले नव्हते. पण भाजप सरकार सत्तेवर येताच आदिवासींचे खाते उघडवले आणि थेट लाभ त्यांच्या खात्यात पोहोचवला.‘आधार’ची योजना काँग्रेसने नंदुरबारपासून सुरू केली आणि ती योजना बंद व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांनीच दावा दाखल केला. लोकांची फसवेगिरी करण्याचे काम काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे नेते करीत होते असा आरोप त्यांनी केला.देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी असलेली पाच एकरची अट काढून ती सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान, नंदुरबारच्या चहाचा संदर्भ देत एक चहावाल्यानेही गेल्या पाच वर्षात कडक सरकार दिल्याचा दावाही त्यांनी केला.आदिवासींच्या वनउपजाला योग्य भाव देऊन आदिवासी शेतकºयांना समृद्ध करण्याचा, कुपोषण, सिकलसेल व आरोग्याबाबत व्यापक योजना राबविण्याचा प्रयत्न आगामी काळात राहणार असल्याचे सांगून भाजपचे सरकार आल्यास यापुढे आदिवासी शेतकºयांना बांबूच्या शेतीसाठी परवानगी देण्याचा निर्णय तसेच या शेतकºयांसाठी पेन्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या वेळी त्यांनी काँग्रेसच्या काळातील धोरणात्मक निर्णयावर आरोप करीत त्यांनी जनतेची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारण